शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू, २०१५चे भारतातील चित्र, अहवालातील धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:51 IST

हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

नवी दिल्ली : हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारांमुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा राहिला.२०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले. त्यापाठोपाठ कामाच्या स्थळी झालेले प्रदूषण धोकायदायक ठरले असून आठ लाख लोक दगावले. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याकडे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल आॅफ मेडिसिनच्या संशोधकांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर आणि केनयात उद्योग झपाट्याने वाढत असून चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो.- भारतात मृत्यूसंख्या- २५ लाख.- चीनची मृत्यूसंख्या - १८ लाख.- जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे होणारे नुकसान दरवर्षी- ४.६ खर्व अमेरिकन डॉलर.- दरवर्षी जगभरात प्रदूषणामुळे मृत्यू- ९० लाख.- एकूण मृत्यूच्या तुुलनेत संख्या- १६ टक्के.- अकाली मृत्यूसाठी सर्वात धोकायदायक ठरणाºया घटकांमध्ये प्रदूषणाचा वाटा सर्वाधिक.- घरात आणि घराबाहेर होणारे प्रदूषण, जलप्रदूषण आणि जमिनीतून होणारे प्रदूषण तसेच रासायनिक प्रदूषण कारणीभूत.- गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फटका.- कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांना न्यूमोकोनिसीसचा धोका.- रंगकाम करणाºयांना ब्लॅडर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भवतो.- अ‍ॅसबेस्टॉसशी संबंधित काम करणाºयांनाही विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यू