शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

सहा महिन्यांत २४ दहशतवाद्यांचा खात्मा; ७ लष्करी जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 10:22 IST

दहशतवाद्यांनी १७ निरपराध नागरिकांची केली हत्या

सुरेश एस. डुग्गर

लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी साडेसहा महिन्यांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या चकमकींमध्ये सात जवान शहीद झाले होते. त्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांनी यंदा १७ निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत १२ चकमकींमध्ये खात्मा केलेल्या २४ दहशतवाद्यांमध्ये १३ जण हे स्थानिक दहशतवादी, सीमेपलीकडून घुसखोरीकरण्याच्या प्रयत्नांत असताना, सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेले ३ दहशतवादी यांचा समावेश आहे, तर अन्य आठ दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही.

गेल्या वर्षी ५२ घुसखोरांसहित ७३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. यंदा सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत काश्मीरमधील स्थानिक नागरिक असलेले दोन कुख्यात दहशतवादी ठार झाले आहेत.

स्थानिक दहशतवादी झाले चकमकीत ठार

यंदाच्या वर्षी श्रीनगर येथील स्थानिक दहशतवादी दानिश ऐजाज शेख हा पुलवामा येथील फ्रासीपोरा गावातील चकमकीत मारला गेला. शोपियां येथील बिलाल रसूल भट हा गोळीबारात ठार झाला. सैफुल्ला, नेहामा पुलवामा येथे रियाज अहमद डार, रईस अहमद या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी