शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदींनी पूर्ण केले आश्वासन, कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले 234 भारतीय देशात परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 09:33 IST

या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देइराणवरून भारतात परतलेल्या या नागरिकांत 131 विद्यार्थी आणि 103 तीर्थ यात्रींचा समावेशशुक्रवारी 44 नागरिकांचा एक जथ्था आला होता इराणहून भारतातइराणमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 700 वर 

नवी दिल्ली -इराणमध्येकोरोनाच्या दहशती खाली अडकलेल्या 234 भारतीय नागरिकांना सुखरुपपणे देशात आणण्यात आले आहे. यात 131 विद्यार्थी आणि 103 तीर्थ यात्रींचा समावेश आहे, अशा माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार असून त्यांना जस्सलमेरच्या क्वॅरंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी शुक्रवारी 44 नागरिकांचा एक जथ्था इराणहूनभारतात आला होता.

इराणमध्ये मृतांचा आकडा आता 700 वर -

इराणवरून 58 नागरिकांचा पहिला जथ्था मंगळवारी भारतात आला होता. इराणमध्ये शनिवारी कोरोणामुळे जवळपास 100 नागरिकांचा मृत्या झाला. याच बरोबर तेथील मृतांचा आकडा आता 700 वर पोहोचला आहे. येथे जवळपास 13 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

खोमैनी यांच्या सल्लागारांनाही कोरोनाची लागण  -

इराणमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एवढेच नाही, तर इराणचे सर्वोच्च नेते खोमैनी यांच्या सल्लागारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा दोन आठवड्यांसाठी बंद केली होती. 

जगभरात जवळपास 150,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इराणमध्ये तब्बल 13,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIranइराणIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा