शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले करतात मोलमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:09 IST

भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.२४ लाख मुली बालवयात बनल्या माताभारतामध्ये १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९२ लाख मुलामुलींचे विवाह झाले असून त्यातील २४ लाख मुली या माता बनल्या आहेत, असे नमूद केलेला हा अहवाल खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी तसेच महत्त्वाचे अधिकारी, बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे.शिक्षणात लिंगभेद पाळू नकाया अहवालामध्ये म्हटले आहे की, १५ ते १८ वर्षे वयातील मुलांना अपायकारक उद्योग नसलेल्या ठिकाणी काम करण्याची मुभा बालमजूर प्रतिबंध व नियंत्रण कायद्याने दिली आहे. त्याचा लाभ २.३ कोटी मुलांना मिळत आहे. मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याच्या हक्काच्या मसुद्यात दुरुस्ती व्हायला हवी. शालेयशिक्षण पद्धतीत लिंगभेद पाळला जाणार नाही याकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांना मोफत माध्यमिक शिक्षण द्यायला हवे.सामुदायिक प्रयत्नांची गरजबलात्कार झालेल्या मुलींपैैकी २५ टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील होत्या. बालकांवर होणारे अत्याचारही वाढत आहेत. त्यासाठी बेकारी व गरिबी या दोन समस्यांवर तोडगा काढावा लागेल, असे अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष स्तुती काकेर म्हणाल्या की, या मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत.

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या