शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:14 IST

पंतप्रधानपदाबाबत अमित शाह यांनी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे.

Amit Shah In Tamil Nadu: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता कंबर कसली असून, देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्रीय मंत्री देशातील विविध राज्यांना भेटी देत असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमित शाहतामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा, याबाबत मोठे विधान केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी तामिळनाडूतून रालोआच्या ३० सहकाऱ्यांना संसदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तामिळनाडूतील वेल्लूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचा आरोप अमित शाह यांनी केली. 

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीने भारताचा पंतप्रधान व्हायला हवे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर अमित शाह गेले होते. चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, तुम्हीच सांगा, काश्मीरचे कलम ३७० हटवायला हवे होते की नाही, काश्मीर आमचे आहे की नाही; पण काँग्रेस आणि द्रमुकचा विरोध होता. हे काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही २ जी, ३ जी आणि ४ जी पक्ष आहेत. मदुराईत एम्स का बांधले नाही, हे तुम्ही लोकांनी विचारावे. द्रमुकने याचे जनतेला उत्तर द्यावे, अशी टीका अमित शाह यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTamilnaduतामिळनाडूprime ministerपंतप्रधानBJPभाजपाlok sabhaलोकसभा