शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:14 IST

पंतप्रधानपदाबाबत अमित शाह यांनी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे.

Amit Shah In Tamil Nadu: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता कंबर कसली असून, देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्रीय मंत्री देशातील विविध राज्यांना भेटी देत असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमित शाहतामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा, याबाबत मोठे विधान केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी तामिळनाडूतून रालोआच्या ३० सहकाऱ्यांना संसदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तामिळनाडूतील वेल्लूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचा आरोप अमित शाह यांनी केली. 

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीने भारताचा पंतप्रधान व्हायला हवे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर अमित शाह गेले होते. चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, तुम्हीच सांगा, काश्मीरचे कलम ३७० हटवायला हवे होते की नाही, काश्मीर आमचे आहे की नाही; पण काँग्रेस आणि द्रमुकचा विरोध होता. हे काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही २ जी, ३ जी आणि ४ जी पक्ष आहेत. मदुराईत एम्स का बांधले नाही, हे तुम्ही लोकांनी विचारावे. द्रमुकने याचे जनतेला उत्तर द्यावे, अशी टीका अमित शाह यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTamilnaduतामिळनाडूprime ministerपंतप्रधानBJPभाजपाlok sabhaलोकसभा