शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:14 IST

पंतप्रधानपदाबाबत अमित शाह यांनी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे.

Amit Shah In Tamil Nadu: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता कंबर कसली असून, देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्रीय मंत्री देशातील विविध राज्यांना भेटी देत असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमित शाहतामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा, याबाबत मोठे विधान केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी तामिळनाडूतून रालोआच्या ३० सहकाऱ्यांना संसदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तामिळनाडूतील वेल्लूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचा आरोप अमित शाह यांनी केली. 

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?

गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीने भारताचा पंतप्रधान व्हायला हवे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर अमित शाह गेले होते. चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, तुम्हीच सांगा, काश्मीरचे कलम ३७० हटवायला हवे होते की नाही, काश्मीर आमचे आहे की नाही; पण काँग्रेस आणि द्रमुकचा विरोध होता. हे काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही २ जी, ३ जी आणि ४ जी पक्ष आहेत. मदुराईत एम्स का बांधले नाही, हे तुम्ही लोकांनी विचारावे. द्रमुकने याचे जनतेला उत्तर द्यावे, अशी टीका अमित शाह यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहTamilnaduतामिळनाडूprime ministerपंतप्रधानBJPभाजपाlok sabhaलोकसभा