शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 09:17 IST

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसन २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनगेल्या १८ वर्षातील सर्वाधिक आकडा २००४ ते २००६ या दरम्यान गोळीबाराची एकही घटना नाही

जम्मू :भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर पाकिस्तानकडून या वर्षभरात म्हणजेच सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जवान शहीद झाले आहेत. तर, १३० जण जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २६ नोव्हेंबर २००३ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षातील एकंदरीत आकडेवारी पाहता पाकिस्तानाकडून हा करार संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. सन २०२० मध्ये पाककडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील एकूण घटनांचा आढावा घेतल्यास सरासरी दिवसाला १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मूमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जवान शहीद झाले. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ मध्ये पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यापैकी ऑगस्ट २०१९ नंतर तब्बल १ हजार ५६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये २ हजार ९३६ वेळा, तर २०१७ मध्ये ९७१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. 

२००४ ते २००६ दरम्यान एकदाही गोळीबार नाही

शस्त्रसंधी कराराचा प्रभाव काही वर्ष दिसून आला. २००४ ते २००६ या कालावधीत सीमाभागात एकदाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले नाही. २००९ नंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. जम्मू, कठुआ, कुपवाडा, बारामुल्ला, सांबा, राजोरी, पूँछ जिल्ह्यात याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन वेळा आपले घर-दार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. 

दरम्यान, पाककडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या सुरक्षेसाठी १४ हजार ४०० बंकर तयार करण्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी ७ हजार ७७७ बंकर तयार असून, कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी आणि पूँछ जिल्ह्यात उर्वरित बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसBorderसीमारेषा