शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 09:17 IST

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसन २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनगेल्या १८ वर्षातील सर्वाधिक आकडा २००४ ते २००६ या दरम्यान गोळीबाराची एकही घटना नाही

जम्मू :भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर पाकिस्तानकडून या वर्षभरात म्हणजेच सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जवान शहीद झाले आहेत. तर, १३० जण जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २६ नोव्हेंबर २००३ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षातील एकंदरीत आकडेवारी पाहता पाकिस्तानाकडून हा करार संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. सन २०२० मध्ये पाककडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील एकूण घटनांचा आढावा घेतल्यास सरासरी दिवसाला १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मूमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जवान शहीद झाले. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ मध्ये पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यापैकी ऑगस्ट २०१९ नंतर तब्बल १ हजार ५६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये २ हजार ९३६ वेळा, तर २०१७ मध्ये ९७१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. 

२००४ ते २००६ दरम्यान एकदाही गोळीबार नाही

शस्त्रसंधी कराराचा प्रभाव काही वर्ष दिसून आला. २००४ ते २००६ या कालावधीत सीमाभागात एकदाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले नाही. २००९ नंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. जम्मू, कठुआ, कुपवाडा, बारामुल्ला, सांबा, राजोरी, पूँछ जिल्ह्यात याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन वेळा आपले घर-दार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. 

दरम्यान, पाककडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या सुरक्षेसाठी १४ हजार ४०० बंकर तयार करण्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी ७ हजार ७७७ बंकर तयार असून, कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी आणि पूँछ जिल्ह्यात उर्वरित बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसBorderसीमारेषा