शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 09:17 IST

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसन २०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनगेल्या १८ वर्षातील सर्वाधिक आकडा २००४ ते २००६ या दरम्यान गोळीबाराची एकही घटना नाही

जम्मू :भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर पाकिस्तानकडून या वर्षभरात म्हणजेच सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जवान शहीद झाले आहेत. तर, १३० जण जखमी झाले आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २६ नोव्हेंबर २००३ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षातील एकंदरीत आकडेवारी पाहता पाकिस्तानाकडून हा करार संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. सन २०२० मध्ये पाककडून तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षातील एकूण घटनांचा आढावा घेतल्यास सरासरी दिवसाला १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मूमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात १५ जवान शहीद झाले. गेल्या वर्षी म्हणजेच सन २०१९ मध्ये पाकिस्तानाकडून ३ हजार २८९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यापैकी ऑगस्ट २०१९ नंतर तब्बल १ हजार ५६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये २ हजार ९३६ वेळा, तर २०१७ मध्ये ९७१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. 

२००४ ते २००६ दरम्यान एकदाही गोळीबार नाही

शस्त्रसंधी कराराचा प्रभाव काही वर्ष दिसून आला. २००४ ते २००६ या कालावधीत सीमाभागात एकदाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले नाही. २००९ नंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. जम्मू, कठुआ, कुपवाडा, बारामुल्ला, सांबा, राजोरी, पूँछ जिल्ह्यात याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. सीमेवरील ग्रामीण भागातील नागरिकांना तीन वेळा आपले घर-दार सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. 

दरम्यान, पाककडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या सुरक्षेसाठी १४ हजार ४०० बंकर तयार करण्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी ७ हजार ७७७ बंकर तयार असून, कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी आणि पूँछ जिल्ह्यात उर्वरित बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसBorderसीमारेषा