शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

भाजपाला आणखी एक धक्का ?, आता 'हा' मित्रपक्ष साथ सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:05 IST

भाजपानं पुन्हा सत्तेत येण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

पाटणा- भाजपानं पुन्हा सत्तेत येण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे मित्र पक्ष त्यांची साथ सोडत आहेत. एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी(आरएलएसपी)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कुशवाह यांनी भर सभेत तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. शनिवारी पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुशवाह म्हणाले, स्वादिष्ट खीर ही यादवांचं दूध आणि कुशवाह लोकांनी पिकवलेल्या भातानंच होऊ शकते.यादवांकडे प्रामुख्यानं दूध उत्पादक म्हणून पाहिलं जातं. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा पक्ष आरजेडींकडे यादवांचं प्राबल्य आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वतः कुशवाह समाजातून आलेले आहेत. कुशवाह समाजाचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन हे भात पिकवणं आहे. त्यामुळे कुशवाह यांनी केलेल्या खिरीचा संदर्भ लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीकडे असल्याचाही काहींचा कयास आहे. येत्या काही दिवसांत कुशवाह महागठबंधनचाही भाग होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.पाटणाच्या श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये मंडल आयोगाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांच्या 100व्या जयंती कार्यक्रमात उपेंद्र कुशवाह यांनी यादव आणि कुशवाह समाजातील लोकांचं कौतुक केलं. तसेच त्यांनी इतर मागासवर्गीय जातीच्या लोकांनाही सोबत घेण्याची भूमिका मांडली. यदूवंशी लोकांचा प्रमुख व्यवसाय हा दूध उत्पादनाचा आहे. कुशवाह समाजानं पिकवलेल्या तांदळातून स्वादिष्ट खीर तयार होऊ शकते. यासाठी आपल्याला अनुसूचित जाती-जमातीतील लोकांनाही सोबत घ्यावं लागेल, असा सूचक इशारा उपेंद्र कुशवाह यांनी दिला आहे.दुसरीकडे केंद्रीय मंत्री कुशवाह गेल्या काही दिवसांपासून एनडीएमध्ये नाराज आहेत. बिहारमध्ये एनडीएचे सहयोगी असलेले नितीश कुमार आणि कुशवाह यांचं फार काही सख्य नाही. ते दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. त्यातच कुशवाह यांना महागठबंधनमध्ये सहभागी होण्याचं बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खुलं निमंत्रण दिलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार