शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:39 IST

भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल.

नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. विधानसभेत जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कक्षात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात तब्बल 20 मिनिटं राजकीय चर्चा झाली. त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

तेजस्वी-नितीश कुमार यांच्या भेटीनंतर बिहारमध्ये एनआरसी लागू न करण्यावर आणि 2010 च्या नियमांनुसार एनपीआर सभागृहात सर्वसंमतीने पास करून घेण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यांच्यात बैठक झाली. यावेळी आरजेडीचे नेते अब्दुल सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार अवधेश नारायण सिंह उपस्थित होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी तीनही नेत्यांसमोर आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तेजस्वी यांनी देखील नितीश कुमारांना एनपीआरसह एनआरसीविरुद्ध प्रस्ताव पास करण्याचा सल्ला दिला. यावर नितीश कुमारांनी ताबडतोब संमती दिली. त्यानंतर नितीश कुमारांनी दोन्ही प्रस्ताव विधानसभेत पारित केले.

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार ?नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या भेटीने पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र येणार असं चित्र बिहारमध्ये निर्माण झाले आहे. नितीश कुमार देखील एनआरसीवरून नाराज आहेत. मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावतील, अशी त्यांना भिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तसेच प्रस्ताव मंजूर करून नितीश कुमारांनी आपण भाजपसोबत असलो तरी मुस्लिमांच्या अधिकारासाठी तत्पर असल्याचा मॅसेज दिला. 

भाजपमध्ये नाराजीभाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल. मात्र भाजपला एनआरसीपेक्षा तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट त्रासदायक वाटत आहे.