शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 09:39 IST

भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल.

नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. विधानसभेत जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कक्षात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात तब्बल 20 मिनिटं राजकीय चर्चा झाली. त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

तेजस्वी-नितीश कुमार यांच्या भेटीनंतर बिहारमध्ये एनआरसी लागू न करण्यावर आणि 2010 च्या नियमांनुसार एनपीआर सभागृहात सर्वसंमतीने पास करून घेण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यांच्यात बैठक झाली. यावेळी आरजेडीचे नेते अब्दुल सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार अवधेश नारायण सिंह उपस्थित होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी तीनही नेत्यांसमोर आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तेजस्वी यांनी देखील नितीश कुमारांना एनपीआरसह एनआरसीविरुद्ध प्रस्ताव पास करण्याचा सल्ला दिला. यावर नितीश कुमारांनी ताबडतोब संमती दिली. त्यानंतर नितीश कुमारांनी दोन्ही प्रस्ताव विधानसभेत पारित केले.

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार ?नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या भेटीने पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र येणार असं चित्र बिहारमध्ये निर्माण झाले आहे. नितीश कुमार देखील एनआरसीवरून नाराज आहेत. मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावतील, अशी त्यांना भिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तसेच प्रस्ताव मंजूर करून नितीश कुमारांनी आपण भाजपसोबत असलो तरी मुस्लिमांच्या अधिकारासाठी तत्पर असल्याचा मॅसेज दिला. 

भाजपमध्ये नाराजीभाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल. मात्र भाजपला एनआरसीपेक्षा तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट त्रासदायक वाटत आहे.