शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केरळमध्ये पावसाचा कहर, भूस्खलन आणि पुरामुळे 20 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:12 IST

मुसळधार पावसाने केरळला झोडपून काढले असून, संततधार पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने २६ जणांचा बळी घेतला असून राज्यात मदतकार्यासाठी लष्कर, हवाई दल व नौदलाला पाचारण करण्याची मागणी केंद्राकडे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे.आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण या पावसाने भरून वाहू लागले असून त्यातून तब्बल २६ वर्षांनंतर गुरुवारी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोची विमानतळावर विमाने उतरविण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे.मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले, राज्यातील २२ धरणांचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा राज्यातील सहा जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला असून, मदतकार्यासाठी तीनही सेनादलांना पाचारण करण्यात यावे, असे केंद्राला कळविले आहे.केरळमधील सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये गुरुवारी बंद होती तसेच अत्यावश्यक काम नसेल तर प्रवास टाळावा, अशी सूचना राज्यातल्या डोंगराळ भागातील रहिवाशांना देण्यात आली आहे.प्रचंड पावसामुळे वायनाड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून त्याचा इतर भागांशी संपर्क तुटलेला आहे. केरळच्या उत्तर भागात पावसामुळे दरडी कोसळून व अन्य दुर्घटनांत २० जण ठार झाले आहेत. त्याशिवाय १० जण बेपत्ता आहेत.>२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले इडुक्की धरणाचे दरवाजेपाच दरवाजे असलेल्या चेरुथोनी धरणातील एक दरवाजा उघडून त्यातून प्रति सेकंदाला ५० हजार लीटर या वेगाने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ४५ वर्षे जुने इडुक्की धरण गेल्या २६ वर्षांत कधीही पूर्णपणे भरले नव्हते. पण यंदा ती वेळ आली. इडुक्की जलाशयावर एकूण तीन धरणे आहेत. त्यातील सर्वांत जास्त जलसाठ्याची क्षमता असलेले पेरियर धरण हे दोन टेकड्यांमध्ये बांधले असून त्याला जलविसर्गासाठी दरवाजे नाहीत. इडुक्की जलाशयावर अजून चेरुथोनी व कुलामावू ही दोन धरणे आहेत. त्यातील चेरुथोनी धरणाचे दरवाजे पूर्णपणे न उघडता अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.आहे." 

टॅग्स :KeralaकेरळRainपाऊसfloodपूर