शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

अग्निपथ योजनेला विरोध अन् रेल्वे विभागाला बसला मोठा फटका; १६ दिवसांत झालं तब्बल २६० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 21:05 IST

ट्रेन्स रद्द झाल्याने प्रवाशांना परत करावे लागले १०० कोटी

Agneepath Scheme, Railway Loss: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी संसदेत आज अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध झाल्यामुळे देशभरात तब्बल दोन हजारहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात असेही सांगितले की १५ जून ते २३ जून दरम्यान २ हजार १३२ गाड्या रद्द करण्यात आल्या. या योजनेला काही लोकांनी प्रचंड विरोध केला. यावेळी लोकांनी हिंसक निदर्शने केली. गाड्या थांबवून त्यांना आग लावण्यात आली. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. या हिंसक आंदोलनात केवळ रेल्वे मालमत्तेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

केंद्र सरकारची अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर हे सर्व घडल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक, केंद्र सरकारला अग्निपथ योजनेद्वारे सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय कमी करायचे आहे. जेणेकरून आपल्या लष्करी जवानांना प्रोत्साहन मिळत राहिला आणि त्यांची ऊर्जा कमी होणार नाही. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणांवर झालेल्या गोंधळामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना भरलेल्या परताव्याच्या रकमेबाबत वेगळा डेटा ठेवला जात नाही. त्यामुळे त्याचाही यात समावेश आहे.

"१४ जून ते ३० जून या १६ दिवसांच्या कालावधीत ट्रेन रद्द होणे आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वेने रेल्वे प्रवाशांना १०२.९६ कोटी रुपये परत केले. पण आता अग्निपथ योजनेमुळे रद्द झालेल्या सर्व प्रभावित रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत", अशी तपशीलवार माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

"भारतीय राज्यघटनेच्या 7 व्या अनुसूची अंतर्गत पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत आणि त्यामुळे रेल्वेवरील गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध, नोंदणी आणि तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न आता संबंधिक राज्य सरकारच्या एजन्सी आणि सरकारी रेल्वे पोलिस आणि राज्य पोलिसांमार्फत सोडवले जात आहेत", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाrailwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव