शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अग्निपथ योजनेला विरोध अन् रेल्वे विभागाला बसला मोठा फटका; १६ दिवसांत झालं तब्बल २६० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 21:05 IST

ट्रेन्स रद्द झाल्याने प्रवाशांना परत करावे लागले १०० कोटी

Agneepath Scheme, Railway Loss: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी संसदेत आज अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध झाल्यामुळे देशभरात तब्बल दोन हजारहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात असेही सांगितले की १५ जून ते २३ जून दरम्यान २ हजार १३२ गाड्या रद्द करण्यात आल्या. या योजनेला काही लोकांनी प्रचंड विरोध केला. यावेळी लोकांनी हिंसक निदर्शने केली. गाड्या थांबवून त्यांना आग लावण्यात आली. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. या हिंसक आंदोलनात केवळ रेल्वे मालमत्तेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

केंद्र सरकारची अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर हे सर्व घडल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक, केंद्र सरकारला अग्निपथ योजनेद्वारे सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय कमी करायचे आहे. जेणेकरून आपल्या लष्करी जवानांना प्रोत्साहन मिळत राहिला आणि त्यांची ऊर्जा कमी होणार नाही. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणांवर झालेल्या गोंधळामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना भरलेल्या परताव्याच्या रकमेबाबत वेगळा डेटा ठेवला जात नाही. त्यामुळे त्याचाही यात समावेश आहे.

"१४ जून ते ३० जून या १६ दिवसांच्या कालावधीत ट्रेन रद्द होणे आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वेने रेल्वे प्रवाशांना १०२.९६ कोटी रुपये परत केले. पण आता अग्निपथ योजनेमुळे रद्द झालेल्या सर्व प्रभावित रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत", अशी तपशीलवार माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

"भारतीय राज्यघटनेच्या 7 व्या अनुसूची अंतर्गत पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत आणि त्यामुळे रेल्वेवरील गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध, नोंदणी आणि तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न आता संबंधिक राज्य सरकारच्या एजन्सी आणि सरकारी रेल्वे पोलिस आणि राज्य पोलिसांमार्फत सोडवले जात आहेत", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाrailwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव