देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:08 AM2022-04-20T11:08:54+5:302022-04-20T11:11:04+5:30

गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली.

2 ethnic riots every day in 5 years in the country, conviction only 10 Percent; Allegations proved against 5.31 percent | देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​

प्रतिकात्मक फोटो.

Next


नितीन अग्रवाल -

नवी दिल्ली :
देशात वेगवेगळ्या राज्यांत जातीय तणावाच्या घटना वाढत असताना केंद्र सरकारकडील अधिकृत माहितीनुसार गेल्या ५ वर्षांत देशात रोज सरासरी २ धार्मिक दंगली झाल्या आहेत.

गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली. अटक झालेल्या १८,५१२ जणांपैकी फक्त ९८४ (५.३१ टक्के) जणांवर आरोप सिद्ध झाले. उत्तर प्रदेशात अपेक्षेनुसार सगळ्यात कमी ६५ धार्मिक दंगली झाल्या व २५ प्रकरणांत आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५०८ पैकी १२२ जणांवरील आरोप सिद्ध झाले.  राजस्थानातील ५५ दंगलींत ५० आरोप सिद्ध झाले. 

सर्वाधिक बिहारमध्ये -
सर्वाधिक ७२१ दंगली बिहारमध्ये झाल्या. तेथे फक्त २.०८ टक्के आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५,०२२ जणांपैकी फक्त ८४ जणांवर आरोप सिद्ध झाले.

महाराष्ट्रात २५९ दंगली -
-     महाराष्ट्रात या कालावधीत २९५ दंगली झाल्या व फक्त २५९ प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. केवळ २ आरोप सिद्ध झाले.
-     राज्यात २,५७६ जणांना अटक झाली व त्यातील फक्त २९ जणांवर आरोप सिद्ध झाले.

दिल्लीत किती? -
-     राजधानी दिल्लीत ५२१ दंगली झाल्या; परंतु एकाही प्रकरणी एकाही जणावर आरोप सिद्ध झाला नाही.
-     २०७ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले. यात ४९८ जण आरोपी असून, ४४३ जणांना अटक झाली. 

हरयाणात झाल्या ४२१ दंगली -
-     २०१६ ते २०२० दरम्यान हरयाणात ४२१ जातीय दंगली झाल्या. यात फक्त १७ घटनांत दोष सिद्ध झाला. राज्यात १,३६७ जणांना अटक झाली; परंतु फक्त १९ जणांवरच आरोप सिद्ध झाले.
-     झारखंडमध्ये ३७१ दंगली झाल्या व १९३ घटनांत आरोपपत्र दाखल झाले. फक्त ११ जणांवर आरोप सिद्ध झाला. एकूण ६१७ जणांना अटक झाली तरी फक्त २१ जणांवरच आरोप सिद्ध झाले.
 

Web Title: 2 ethnic riots every day in 5 years in the country, conviction only 10 Percent; Allegations proved against 5.31 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.