शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

देशात ८ कोटीच गरीब; ६ वर्षांत झाली ७० टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 02:54 IST

शोधनिबंधात अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन : वेगवान विकासदर, ‘मनरेगा’, किसान योजना, स्वयंपाक गॅसवर अनुदान यांमुळे शक्य

नवी दिल्ली : भारतात २०११ ते २०१७ या सहा वर्षांत दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत घट होऊन ही संख्या २७ कोटींवरून कमी होऊन ८.१ कोटी झाली, असा दावा काही अर्ततज्ज्ञांनी एका शोधनिबंधात केला आहे. सुरजीत एस. भल्ला, अरविंद वीरमणी व करण भसिन या अर्थतज्ज्ञांनी ‘पॉव्हर्टी, इनइक्वालिटी अ‍ॅण्ड इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन इंडिया: २०११/१२-२०१७-१८’ या शीर्षकाचा शोधनिबंध अलिकडेच ‘नॅशनल कौन्सिल फॉर अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च’ संस्थेस सादर केला. या तिघांनी निष्कर्ष काढला की, दारिद्र्यरेषा ठरविण्याच्या तेंडुलकर सूत्रानुसार गरिबीचे प्रमाण २०११ मधील १४.९ टक्क्यांवरून २०१७ पर्यंत सात टक्के एवढे कमी झाले. देशातील गरिबी कमी होण्याचा आजवरचा हा सर्वात वेगवान काळ आहे.जागतिक बँकेचा हवाला : जागतिक बँकेने भारताचे वर्गीकरण मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमध्ये केले आहे. त्यानुसार क्रयशक्तीची समानता राखून हिशेब केला तर भारतासाठी दारिद्र्यरेषा दरमहा २०० रुपये एवढ्या उत्पन्नाची ठरते. जागतिक बँकेनेही या सहा वर्षांत भारतातील गरिबी न भूतो अशा वेगाने कमी होऊन ५८ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर आल्याचे नमूद केले आहे.शोधनिबंध म्हणतो की, या काळात अर्थव्यवस्थेने टिकवलेला वेगवान विकासदर व सरकारने राबविलेल्या ‘मनरेगा’, ‘डीबीटी’, पंतप्रधान किसान योजना, गॅसवरील अनुदान आदी योजनांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य निर्मूलन शक्य झाले. सरकारच्या या उपायांमुळे मोठ्या वर्गाच्या हाती अधिक क्रयशक्ती आली.तेंडुलकर सूत्राखेरीज इतरही तीन पद्धतीने त्यांनी गरिबीमधील या घटीचे स्वतंत्र अंदाज काढले आहेत. इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार २०१७ मधील हे प्रमाण ७.४ टक्के व ३.४ टक्के तर राष्ट्रीय खतावणीमधील आकडेवारीनुसार ३.४ टक्के एवढे येते. यावरून सरकारच्या आर्थिक धोरणांचा लाभ तळागळापर्यंत झिरपल्याचे दिसते, असे या अर्थतज्ज्ञांना वाटते. 

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारत