शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

गेल्या पाच वर्षांत 182 आमदार भाजपमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 01:57 IST

४३३ खासदार-आमदारांचे पक्षांतर

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजकारणात पक्षांतर नवे नाही. त्यातच निवडणुका जवळ येताच राजकीय नेते पक्ष बदलताना दिसतात. एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये निवडणुकीच्या काळात ४३३ खासदार आणि आमदारांनी पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविली असून, त्यात सर्वाधिक  १७० आमदार काँग्रेसचे आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या केवळ १८ आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे.

‘असाेसिएशन ऑफ डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स’ (एडीआर) या समूहाने हा अहवाल तयार केला आहे. त्यात ४३३ खासदार आणि आमदारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार २०१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या निवडणुकीदरम्यान ४०५ आमदारांनी पक्षांतर केले. त्यापैकी सर्वाधिक १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यानंतर ३८ जणांनी काँग्रेस तर २५ जणांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या पाच खासदारांनी पक्षांतर केले. तर २०१६ ते २०२० या कालावधीत काँग्रेसच्या सहा राज्यसभा सदस्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी दिली. या कालावधीत पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या १६ पैकी १० राज्यसभा सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर १२ पैकी ५ लाेकसभा सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली.

पक्षांतरामुळे पडले सरकारमध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार पडले हाेते. या आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढविली हाेती.n४३३ आमदार आणि खासदारांचे पक्षांतरn४०५ आमदारांनी पक्षाला केला रामरामn१७० आमदार काँग्रेसचेn१८२ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेशn१८ आमदारांचा भाजपला रामराम

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदार