शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील महापुरात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:38 IST

गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा मृतांचा आकडा 119वर पोहोचला20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

पालनपूर, दि. 27 - गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खरिया गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी या सर्वांचे मृतदेह हाती लागले असता सर्वांना धक्काच बसला. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. नदीमधून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा 119वर पोहोचला आहे. बचावकार्य अद्यापही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 

खरिया गावातील लोकांना जेव्हा एकामागोमाग एक मृतदेह सापडत होते तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मृतदेहांचे शोध घेत असता एकाच वेळी हे सर्व मृतदेह हाती लागले. हे सर्वजण ओबीसी ठाकोर समुदायातील होते. मृतांमध्ये आठ महिला आणि एका आठ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. 

मुसळधार पावसामुळे बनास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. ज्यानंतर खऱियासहित 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 'हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री वाहून गेले असल्याची शक्यता आहे', असं व्ही एम पाटील या अधिका-याने सांगितलं आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लष्कर जवान, एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. भारतीय हवाई दलाची 10 हेलिकॉप्टर्स बचावकार्यात मदत करत आहेत. 

धारोई धरणातून 1.24 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर भावनगर - अहमदाबाद हायवेवरदेखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळ असणारी सर्वा गावे आधीच रिकामी करण्यात आली होती. 20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी अवंतिका सिंह औलख यांनी सांगितलं आहे. 

दंतीवाडा तालुक्यातील दाभिपुरा गावातील पुराचं पाणी तीन दिवसांनी कमी झालं असता गावकरी माघारी परतले. मात्र आपलं जे काही होतं ते सगळं नष्ट झाल्याचं पाहून त्यांच्या भावना अनावर झाल्या. 'आम्ही सगळंच गमावून बसलो आहोत. आम्ही साठवलेलं धान्यही वाहून गेलं. आमच्या घरांना तडे गेले आहेत', असं एका गावक-याने सांगितलं. 

बुधवारी जवळपास 650 लोकांना पुरातून वाचवण्यात आलं. यापैकी 272 जणांना एअरलिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.