शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गुजरातमधील महापुरात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:38 IST

गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा मृतांचा आकडा 119वर पोहोचला20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

पालनपूर, दि. 27 - गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खरिया गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी या सर्वांचे मृतदेह हाती लागले असता सर्वांना धक्काच बसला. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. नदीमधून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा 119वर पोहोचला आहे. बचावकार्य अद्यापही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 

खरिया गावातील लोकांना जेव्हा एकामागोमाग एक मृतदेह सापडत होते तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मृतदेहांचे शोध घेत असता एकाच वेळी हे सर्व मृतदेह हाती लागले. हे सर्वजण ओबीसी ठाकोर समुदायातील होते. मृतांमध्ये आठ महिला आणि एका आठ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. 

मुसळधार पावसामुळे बनास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. ज्यानंतर खऱियासहित 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 'हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री वाहून गेले असल्याची शक्यता आहे', असं व्ही एम पाटील या अधिका-याने सांगितलं आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लष्कर जवान, एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. भारतीय हवाई दलाची 10 हेलिकॉप्टर्स बचावकार्यात मदत करत आहेत. 

धारोई धरणातून 1.24 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर भावनगर - अहमदाबाद हायवेवरदेखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळ असणारी सर्वा गावे आधीच रिकामी करण्यात आली होती. 20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी अवंतिका सिंह औलख यांनी सांगितलं आहे. 

दंतीवाडा तालुक्यातील दाभिपुरा गावातील पुराचं पाणी तीन दिवसांनी कमी झालं असता गावकरी माघारी परतले. मात्र आपलं जे काही होतं ते सगळं नष्ट झाल्याचं पाहून त्यांच्या भावना अनावर झाल्या. 'आम्ही सगळंच गमावून बसलो आहोत. आम्ही साठवलेलं धान्यही वाहून गेलं. आमच्या घरांना तडे गेले आहेत', असं एका गावक-याने सांगितलं. 

बुधवारी जवळपास 650 लोकांना पुरातून वाचवण्यात आलं. यापैकी 272 जणांना एअरलिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.