शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गुजरातमधील महापुरात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:38 IST

गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा मृतांचा आकडा 119वर पोहोचला20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

पालनपूर, दि. 27 - गुजरातमध्ये महापुराने थैमान घाततं असून एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खरिया गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी या सर्वांचे मृतदेह हाती लागले असता सर्वांना धक्काच बसला. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते. नदीमधून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा 119वर पोहोचला आहे. बचावकार्य अद्यापही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 

खरिया गावातील लोकांना जेव्हा एकामागोमाग एक मृतदेह सापडत होते तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मृतदेहांचे शोध घेत असता एकाच वेळी हे सर्व मृतदेह हाती लागले. हे सर्वजण ओबीसी ठाकोर समुदायातील होते. मृतांमध्ये आठ महिला आणि एका आठ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. 

मुसळधार पावसामुळे बनास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. ज्यानंतर खऱियासहित 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 'हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री वाहून गेले असल्याची शक्यता आहे', असं व्ही एम पाटील या अधिका-याने सांगितलं आहे. सध्या बचावकार्य सुरु असून लष्कर जवान, एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. भारतीय हवाई दलाची 10 हेलिकॉप्टर्स बचावकार्यात मदत करत आहेत. 

धारोई धरणातून 1.24 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर भावनगर - अहमदाबाद हायवेवरदेखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळ असणारी सर्वा गावे आधीच रिकामी करण्यात आली होती. 20 गावांमधील जवळपास 3858 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी अवंतिका सिंह औलख यांनी सांगितलं आहे. 

दंतीवाडा तालुक्यातील दाभिपुरा गावातील पुराचं पाणी तीन दिवसांनी कमी झालं असता गावकरी माघारी परतले. मात्र आपलं जे काही होतं ते सगळं नष्ट झाल्याचं पाहून त्यांच्या भावना अनावर झाल्या. 'आम्ही सगळंच गमावून बसलो आहोत. आम्ही साठवलेलं धान्यही वाहून गेलं. आमच्या घरांना तडे गेले आहेत', असं एका गावक-याने सांगितलं. 

बुधवारी जवळपास 650 लोकांना पुरातून वाचवण्यात आलं. यापैकी 272 जणांना एअरलिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.