शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

मोठी बातमी! हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रुळावरून घसरले; २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:22 IST

झारखंड येथे हावडा मुंबई मेलचे डबे पटरीवरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यात २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. 

रांची - झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडलच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे. या रेल्वेचे १८ डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झालेत. घटनास्थळी पोहचलेल्या रेल्वे कर्मचारी, एडीआरएम, पोलीस, प्रशासनाने जखमींना रेस्क्यू केले आहे. त्याचसोबत या ट्रेनमधील ८० टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्टेशनला पाठवलं आहे.

माहितीनुसार, १२१८० हावडा - सीएसएमटी एक्सप्रेस पहाटे ३.४५ वाजता चक्रधरपूर विभागातील राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली. या ट्रेनचे १८ डबे रुळावरून घसरले. दुर्घटनेत २ मृत्युमुखी पडले. प्रशासनाकडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफची टीमची बचाव कार्यात गुंतली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सिंहभूम आणि सरायकेला खरसावां जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत तात्काळ जखमींच्या उपचाराची व्यवस्था करावी असं सांगितले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तर या दुर्घटनेत मुंबई हावडा मेल आणि एका मालगाडीचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 

आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं

दरम्यान, हावडा-मुंबई मेलला झालेल्या अपघाताबद्दल राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका करत रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय की, मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे काही तरी "कवच" नक्की आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना हटवण्यात आलेले नाही.नदर आठवड्याला आपण काही अपघात पाहतो आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याऐवजी, जे रेल्वेमंत्री आहेत त्यांना भाजपा महाराष्ट्राचे निवडणुकीसाठी ‘राजकीय प्रभारी’ बनवण्यात आलं आहे. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAaditya Thackerayआदित्य ठाकरे