शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मोठी बातमी! हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रुळावरून घसरले; २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 11:22 IST

झारखंड येथे हावडा मुंबई मेलचे डबे पटरीवरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यात २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. 

रांची - झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडलच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे. या रेल्वेचे १८ डबे रुळावरून घसरले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झालेत. घटनास्थळी पोहचलेल्या रेल्वे कर्मचारी, एडीआरएम, पोलीस, प्रशासनाने जखमींना रेस्क्यू केले आहे. त्याचसोबत या ट्रेनमधील ८० टक्के प्रवाशांना चक्रधरपूर रेल्वे स्टेशनला पाठवलं आहे.

माहितीनुसार, १२१८० हावडा - सीएसएमटी एक्सप्रेस पहाटे ३.४५ वाजता चक्रधरपूर विभागातील राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली. या ट्रेनचे १८ डबे रुळावरून घसरले. दुर्घटनेत २ मृत्युमुखी पडले. प्रशासनाकडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफची टीमची बचाव कार्यात गुंतली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सिंहभूम आणि सरायकेला खरसावां जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत तात्काळ जखमींच्या उपचाराची व्यवस्था करावी असं सांगितले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तर या दुर्घटनेत मुंबई हावडा मेल आणि एका मालगाडीचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 

आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं

दरम्यान, हावडा-मुंबई मेलला झालेल्या अपघाताबद्दल राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका करत रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय की, मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वेमंत्र्यांकडे काही तरी "कवच" नक्की आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना हटवण्यात आलेले नाही.नदर आठवड्याला आपण काही अपघात पाहतो आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याऐवजी, जे रेल्वेमंत्री आहेत त्यांना भाजपा महाराष्ट्राचे निवडणुकीसाठी ‘राजकीय प्रभारी’ बनवण्यात आलं आहे. त्यांनी मंत्रालयावर लक्ष केंद्रित करायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAaditya Thackerayआदित्य ठाकरे