शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

फक्त ३० टक्के मते घेऊन १७८ नेते बनले खासदार; निवडणूक आयाेगाची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:49 IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळवून १२५ नेते खासदार झाले होते. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी १७८ खासदार एकूण मतदारांच्या तुलनेत केवळ ३० टक्के मते मिळवून निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ३० टक्के मते मिळवून १२५ नेते खासदार झाले होते. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते. पक्षनिहाय पाहायला गेले तर भाजपच्या २४० खासदारांपैकी ५७, काँग्रेसच्या ९९ खासदारांपैकी ३०, समाजवादी पक्षाच्या ३७ खासदारांपैकी ३१ खासदारांनी ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी मते मिळवून विजय मिळवला आहे. भाजपला २३.५९ कोटी, काँग्रेसला १३.६७ कोटी आणि समाजवादी पार्टीला २.९५ कोटी मते मिळाली आहेत.

विजयी उमेदवारांची संख्या ३०% पर्यंत    ०५ ३० ते ४०%    २८ ४० ते ५०%    २३० ५० ते ६०%    २१५ ६० ते ७०%    ५७ ७०%+    ०७

महाराष्ट्रात काय?५४२ लोकसभा मतदारसंघातील आठ खासदार केवळ १० ते २० टक्के मते घेत निवडून आले आहेत. तर १७० उमेदवार २० ते ३० टक्के मते घेत निवडून आले. यासह २६६ खासदार ३० ते ४० टक्के मते मिळवून विजयी झाले.तर ९२ खासदार ४० ते ५० टक्के मते मिळवून विजयी झाले आहेत. केवळ ६ खासदार ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या महाराष्ट्रातील २४ खासदार आहेत. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMember of parliamentखासदार