शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Himachal Pradesh Bus Accident: धक्कादायक! हिमाचलच्या कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह १६ जणांचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:17 IST

Himachal Pradesh Bus Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील सांज दरी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. शंशारवरून सांजकडे जात असलेली एक खासगी बस जंगला या गावाजवळील दरीत कोसळली. सकाळी साडे आठ वाजता झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांसह १६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्यामध्ये बस पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये किमान ४० विद्यार्थी होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घेतली धाव 

कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी म्हटले की, सांजवरून निघालेली बस जंगला या गावाजवळील दरीत सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी आणि बचाव दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि जखमींना जवळ असलेल्या एका रूग्णालयात दाखल केले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रपतींकडून तीव्र शोक व्यक्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या बस दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह १६ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी ऐकून मन व्यथित झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपली मुले आणि प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केली. 

पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर 

पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले, “हिमाचल प्रदेशामधील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य तेवढी मदत करेल.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक जखमीला ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना ५-५ लाख देण्याची घोषणा 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, कुल्लू येथील सांज दरीत एक खासगी बस कोसळल्याची दु:खद बातमी मिळाली. संपूर्ण प्रशासन घटनास्थळी आहे, जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. ईश्वर या घटनेतील मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना शक्ती देवो. दुसरीकडे, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, कुल्लूचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना १५ हजार रुपये तत्काळ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून मदत जाहीर केल्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात