शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 18:53 IST

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय.

ठळक मुद्देराज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे

 कोरोना महामारीमुळे देशातील प्रार्थनास्थळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंदच आहेत. मंदिरे बंद असल्याने तेथील पुजारी व पुरोहितांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे, पुजाऱ्यांनाही सरकारने सहायता निधी द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती. आसाम सरकारने राज्यातील मंदिरांच्या पुजाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मंदिरांतील पुजाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय आसाम सरकारने जाहीर केला. हिंदू जनजागृती समितीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातही गेल्या 1.5 वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे, हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्रातील पुजाऱ्यांनाही 15 हजार रुपये सहायता निधी देण्याची मागणी केली आहे. मंदिरे बंद असल्याने तेथील लहान-सहान उद्योग ठप्प झाले आहेत. तर, मंदिरातील पुजाऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे, मंदिरे खुली करण्याची मागणीही सातत्याने होत आहे. 

दरम्यान, राज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची सातारा येथील निवासस्थानी भेट घेवून देवस्थान मंदिरे उघडण्याची व समस्त पुजारी (गुरव) समाजाला मानधन मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

मनसेचीही मंदिरं खुली करण्याची मागणी

केवळ मंदिरे उघडल्याने कोरोनाचा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच, जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे, राज्यातील प्रार्थनास्थळे कधी उघडणार, तेथील अर्थकारण कधी सुरू होणार, मुख्यमंत्री कधी भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे.   

देवेंद्र फडणवीसांनीही केली होती मागणी

देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पंढरपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूChief Ministerमुख्यमंत्री