शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकातील 15 अपात्र आमदारांचा भाजपात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 12:04 IST

17 बंडखोर आमदारांपैकी 15 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

ठळक मुद्दे17 बंडखोर आमदारांपैकी 15 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि प्रदेश अध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या उपस्थित 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला.कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

बंगळूरू - कर्नाटकातील 17 बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. या आमदारांना पोटनिवडणूक लढता येणार आहे. मात्र, तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरविलेला निर्णय योग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यानंतर आता गुरुवारी (14 नोव्हेंबर) 17 बंडखोर आमदारांपैकी 15 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकमधील पक्ष मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 15 आमदारांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि प्रदेश अध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या उपस्थित 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूक भाजपा या आमदारांना तिकीट देऊ शकतं. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान सहा ते सात जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही.

 

तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरविले होते. या कारवाईविरोधात 17 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात न्या. एन.व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर पूर्ण झाली होती. या सुनावणीचा निकाल आज लागला असून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. मात्र, आमदारांना विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही, असे सांगत त्यांना पोटनिवडणूक लढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. 

कर्नाटकातील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि जनता दल आघाडी सरकारचा 17 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. परिणामी आघाडीचे सरकार कोसळले. या आमदारांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे तत्कालीन विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले होते. पण तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामे स्वीकृत केले नाहीत. याउलट विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी पक्षादेशाचे पालन केले नाही म्हणून पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार 17 आमदारांना अपात्र ठरविले होते. तसेच विद्यमान विधानसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजे मे 2023 पर्यंत या अपात्र ठरविताना विधानसभेची निवडणूक लढविता येणार नाही, असाही आदेश तत्कालीन अध्यक्षांनी दिला होता. दरम्यान, अपात्र आमदारांमुळे रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांत 11 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाYeddyurappaयेडियुरप्पाElectionनिवडणूक