१५ वाहनांवर सव्वा लाखाचा दंड
By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST
नायगाव बाजार : विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून वाहतूक करणारे व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणार्या १५ वाहनांना पकडून तहसीलदारांच्या भरारी पथकाने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला़
१५ वाहनांवर सव्वा लाखाचा दंड
नायगाव बाजार : विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून वाहतूक करणारे व क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणार्या १५ वाहनांना पकडून तहसीलदारांच्या भरारी पथकाने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला़तालुक्यातील कहाळा-नरसी, मुस्तापूर-राहेर, कहाळा-गडगा या मार्गावरून वाहनामध्ये जास्त वाळू भरणे, मुदतबा टोकनचा वापर करणे, विनापरवाना गौण खनिजाचा उपसा करून अनेक वाहनधारक त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाल्याने त्यांनी दोन भरारी पथके वरील मार्गावर पाठवून दिली़ पथकांनी जागोजागी वाहने उभी करून त्याची तपासणी केली असता, एम़एच़२६-८६८५, एम़एच़२६-२४६५, एम़एच़२६-१६९०, एम़एच़२६-७९५३, एम़एच़२६-९९९७, एमएच़२६-२९३, एम़एच़२६-१७०९, एम़एच़२६-४६९, एम़एच़०४-५६७४, एम़एच़४३-१२५८, एम़एच़०४-५८६, एम़एच़१२-७३८४, एम़एच़४३-२७५५, एम़एच़२६-३२०, एम़एच़२६-१८८९ अशी १५ वाहने बेकायेदशीररित्या वाळू, मुरुमाची वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला़ या पथकात तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार अ़रब, कापसे, मंडळ अधिकारी बी़बी़कदम, एऩबी़सानप, हेमंत कुलकर्णी, ए़एम़चव्हाण, तलाठी ए़आऱराठोड, विजय जाधव, एस़डी़ आरू व त्यांचे सहकारी होते़