शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७0 रद्द केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या १४२ अल्पवयीनांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:29 AM

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते, असे उघड झाले आहे. ही मुले ९ ते १७ वयाची होती. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बाल या समितीनेच सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.या १४४ पैकी १४२ अल्पवयीन मुलांची आता सुटका करण्यात आली आहे आणि दोघा जणांना तेथील बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली आहे. पोलीस, तसेच तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समितीने हे न्यायालयाला कळविले आहे.कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलेले वा डांबून ठेवण्यात आलेले नाही आणि बालहक्कांचे कठोर पालन करण्यात यावे, असे सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आले आहे, असे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले असल्याचा उल्लेखही समितीने केला आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या चारपैकी एका अल्पवयीन मुलाला सोडण्यात आले आहे.बालहक्क कार्यकर्त्यांचा होता अर्जबालहक्कासाठी काम करणाऱ्या इनाक्षी गांगुली व शांता सिन्हा यांनी काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती.त्यावरील सुनावणीमध्ये न्यायालयाने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बालन्याय समितीला या प्रकरणाची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर न्या. अली मोहम्मद माग्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पोलीस व तपास यंत्रणांकडून माहिती मिळवून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर