शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:07 IST

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका यूके उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फरार नीरवला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, याला थोडा वेळ लागू शकतो. नीरव मोदी 2018 पासून फरार आहे. 

भारतात आल्यानंतर तपास यंत्रणा आधी त्याची चौकशी करतील आणि नंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी सीबीआय आणि ईडीकडे आहे. मुत्सद्देगिरी आणि मानवी हक्कांची योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यूके पोलीस नीरवला केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवतील. यानंतर तपास यंत्रणा नीरवला ब्रिटनमधून भारतात आणेल.

नीरववर कोणते गुन्हे दाखल आहेत?

  • मनी लाँडरिंग प्रकरण- प्राथमिक तपासानंतर सीबीआयने नीरव मोदीविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. यानंतर ईडीनेही चौकशी सुरू केली. पीएमएलए कोर्टाने नीरवला फरार घोषित केले आहे.
  • गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे प्रकरण- पीएनबीच्या तक्रारीवरून 29 जानेवारी 2018 रोजी मुंबई पोलिसांनी नीरव मोदीविरुद्ध गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पीएनबीच्या उपमहाव्यवस्थापकांनी ही तक्रार केली आहे.
  • सरकारी कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा गुन्हा- सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरवने किती रुपयांची फसवणूक केली?पीएनबीच्या तक्रारीनुसार, नीरव मोदीने 8 हप्त्यांमध्ये सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज फेब्रुवारी 2017 मध्ये घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर नीरव काही दिवस बँकेची दिशाभूल करत राहिला आणि नंतर भारतातून पळून गेला. सुप्रीम कोर्टाचे वकील ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आल्यानंतर ईडी आणि सीबीआय नीरव मोदीची स्वतंत्रपणे चौकशी करतील. ईडीचा तपास मनी लाँड्रिंगवर आधारित असेल, तर सीबीआय गुन्हेगारी कट आणि फसवणुकीची चौकशी करेल.

नीरवची सुरक्षा हेही मोठे आव्हान आहेनीरव मोदीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात सांगितले की, मुंबईतील आर्थर जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे. नीरवच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याची हत्या होऊ शकते किंवा तो स्वत: आत्महत्या करेल, असे म्हटले होते. भारतात आणल्यानंतर नीरवच्या सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे. मात्र, नीरवला विशेष कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे भारत सरकारने यूके उच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्याला आठवड्यातून एकदा वकिलाला आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली जाईल. 

नीरवला काय शिक्षा?अधिवक्ता ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरवविरोधात तीन कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्व कलमांमध्ये शिक्षेची वेगळी तरतूद आहे. पीएमएलए अंतर्गत 3 वर्षे आणि त्याहून अधिक सश्रम कारावास होऊ शकतो. जामीन मिळणेही कठीण होईल. फसवणूक प्रकरणात 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. गुन्हेगारी कट रचण्यासाठी अशीच शिक्षा आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी