शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:07 IST

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका यूके उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फरार नीरवला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, याला थोडा वेळ लागू शकतो. नीरव मोदी 2018 पासून फरार आहे. 

भारतात आल्यानंतर तपास यंत्रणा आधी त्याची चौकशी करतील आणि नंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी सीबीआय आणि ईडीकडे आहे. मुत्सद्देगिरी आणि मानवी हक्कांची योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यूके पोलीस नीरवला केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवतील. यानंतर तपास यंत्रणा नीरवला ब्रिटनमधून भारतात आणेल.

नीरववर कोणते गुन्हे दाखल आहेत?

  • मनी लाँडरिंग प्रकरण- प्राथमिक तपासानंतर सीबीआयने नीरव मोदीविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. यानंतर ईडीनेही चौकशी सुरू केली. पीएमएलए कोर्टाने नीरवला फरार घोषित केले आहे.
  • गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे प्रकरण- पीएनबीच्या तक्रारीवरून 29 जानेवारी 2018 रोजी मुंबई पोलिसांनी नीरव मोदीविरुद्ध गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पीएनबीच्या उपमहाव्यवस्थापकांनी ही तक्रार केली आहे.
  • सरकारी कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा गुन्हा- सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरवने किती रुपयांची फसवणूक केली?पीएनबीच्या तक्रारीनुसार, नीरव मोदीने 8 हप्त्यांमध्ये सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज फेब्रुवारी 2017 मध्ये घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर नीरव काही दिवस बँकेची दिशाभूल करत राहिला आणि नंतर भारतातून पळून गेला. सुप्रीम कोर्टाचे वकील ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आल्यानंतर ईडी आणि सीबीआय नीरव मोदीची स्वतंत्रपणे चौकशी करतील. ईडीचा तपास मनी लाँड्रिंगवर आधारित असेल, तर सीबीआय गुन्हेगारी कट आणि फसवणुकीची चौकशी करेल.

नीरवची सुरक्षा हेही मोठे आव्हान आहेनीरव मोदीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात सांगितले की, मुंबईतील आर्थर जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे. नीरवच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याची हत्या होऊ शकते किंवा तो स्वत: आत्महत्या करेल, असे म्हटले होते. भारतात आणल्यानंतर नीरवच्या सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे. मात्र, नीरवला विशेष कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे भारत सरकारने यूके उच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्याला आठवड्यातून एकदा वकिलाला आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली जाईल. 

नीरवला काय शिक्षा?अधिवक्ता ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरवविरोधात तीन कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्व कलमांमध्ये शिक्षेची वेगळी तरतूद आहे. पीएमएलए अंतर्गत 3 वर्षे आणि त्याहून अधिक सश्रम कारावास होऊ शकतो. जामीन मिळणेही कठीण होईल. फसवणूक प्रकरणात 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. गुन्हेगारी कट रचण्यासाठी अशीच शिक्षा आहे. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी