शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"अन्न सुरक्षेपासून अद्यापही १४ कोटी लोक वंचित; लवकरात लवकर जनगणना करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:06 IST

अद्यापही अन्नसुरक्षा कायद्याद्वारे निश्चित केलेली लाभार्थींची संख्या २०११च्या जनगणनेवर आधारित आहे

नवी दिल्ली : देशात १४ कोटी लोक अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जनगणनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात केली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची नोंद अद्यापही २०११च्या जनगणनेच्या आधारावर केली जाते. त्यामुळे असंख्य लोकांचे नाव लाभार्थींच्या यादीत येत नाही. 

सोनिया गांधी म्हणाल्या की, यूपीए सरकारने २०१३ साली केलेला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. देशातील १४० कोटी जनतेला अन्न तसेच पोषणविषयक सुरक्षा प्रदान करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. देशातील कोट्यवधी कुटुंबांची विशेषतः कोरोना साथीच्या काळात उपासमार होऊ न देण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अद्यापही अन्नसुरक्षा कायद्याद्वारे निश्चित केलेली लाभार्थींची संख्या २०११च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यामुळे ८१.३५ कोटी लोकांना त्याचा फायदा मिळतो. त्यांनी सांगितले की, नवी जनगणना होण्यास दहा वर्षांहून अधिक काळाचा विलंब झाला अशी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

‘अन्नसुरक्षा हा अधिकार’

सोनिया गांधी यांनी सांगितले की, जनगणना सुरू करून ती लवकर पूर्ण केली पाहिजे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचे फायदे मिळतील याकडे लक्ष द्यावे. अन्नसुरक्षा हा विशेषाधिकार नव्हे तर मूलभूत अधिकार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत मोफत धान्य वितरणाची मुदत १ जानेवारी २०२४पासून पाच वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी केलेली मागणी महत्त्वाची आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा