शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"अन्न सुरक्षेपासून अद्यापही १४ कोटी लोक वंचित; लवकरात लवकर जनगणना करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:06 IST

अद्यापही अन्नसुरक्षा कायद्याद्वारे निश्चित केलेली लाभार्थींची संख्या २०११च्या जनगणनेवर आधारित आहे

नवी दिल्ली : देशात १४ कोटी लोक अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जनगणनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात केली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची नोंद अद्यापही २०११च्या जनगणनेच्या आधारावर केली जाते. त्यामुळे असंख्य लोकांचे नाव लाभार्थींच्या यादीत येत नाही. 

सोनिया गांधी म्हणाल्या की, यूपीए सरकारने २०१३ साली केलेला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. देशातील १४० कोटी जनतेला अन्न तसेच पोषणविषयक सुरक्षा प्रदान करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. देशातील कोट्यवधी कुटुंबांची विशेषतः कोरोना साथीच्या काळात उपासमार होऊ न देण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अद्यापही अन्नसुरक्षा कायद्याद्वारे निश्चित केलेली लाभार्थींची संख्या २०११च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यामुळे ८१.३५ कोटी लोकांना त्याचा फायदा मिळतो. त्यांनी सांगितले की, नवी जनगणना होण्यास दहा वर्षांहून अधिक काळाचा विलंब झाला अशी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

‘अन्नसुरक्षा हा अधिकार’

सोनिया गांधी यांनी सांगितले की, जनगणना सुरू करून ती लवकर पूर्ण केली पाहिजे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचे फायदे मिळतील याकडे लक्ष द्यावे. अन्नसुरक्षा हा विशेषाधिकार नव्हे तर मूलभूत अधिकार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत मोफत धान्य वितरणाची मुदत १ जानेवारी २०२४पासून पाच वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी केलेली मागणी महत्त्वाची आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा