शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 6:44 AM

मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले.

हैदराबाद : मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ही रक्कम कर्नाटकातून आली होती, अशी प्राथमिक आहे. पण ती कोणी व कोणासाठी पाठवली हे स्पष्ट झालेले नाही.सराफ व हिरे व्यापारी यांची ही रक्कम असल्याचा अंदाज आहे. पण हे खरे नाही. सराफ व हिरे व्यापारी इतके चाणाक्ष असतात की निवडणुकांच्या काळात आपल्याकडील काळाच काय, पण पांढरा पैसाही रोखीच्या स्वरूपात कुठे पाठवत नाहीत. त्यामुळे ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठीच आली असणार, हे उघड आहे. ही एवढीच रक्कम नाही. आतापर्यंत तेलंगणात १२0 कोटी रुपये या पद्धतीने जप्त करण्यात आले. विधानसभेच्या ११९ मतदारसंघांत जप्त करण्यात आलेली रक्कम आहे १२0 कोटी रुपये. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी १ कोटींहून अधिक काळा पैसा आला आहे. पण ही जप्त करण्यात आलेली रक्कम आहे. जी रक्कम पकडली गेली नाही, ती याहून अधिक असावी, असा अंदाज आहे.विधानभा निवडणुकांच्या काळातच ही रक्कम आली, याचाच अर्थ ती मतदारांना थेट वाटण्यासाठी वा निवडणुकांवर खर्च करण्यासाठी होती, हे उघड आहे. निवडणूक अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सप्टेंबरमध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच आपले १0५ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे काळा पैसाही या काळात अधिक आला.मात्र राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीसाठी हा पैसा आला का, याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही.>मध्यप्रदेशात २९ कोटी,राजस्थानात ३५ कोटीमध्य प्रदेशातील मतदानआधीच झाले आहे. तिथे २३0 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक काळात मध्यप्रदेशात २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती, तर राजस्थानात उद्या, शुक्रवारी मतदान व्हायचे आहे. तिथे आतापर्यंत ३५ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत.>नोटाबंदीचा हेतू साध्य झाला नाहीनोटाबंदी जाहीर करताना मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालणे हाही एक हेतू असल्याचे जाहीर केले होते. पण तसे घडले नाही. नोटाबंदीमुळे निवडणुकांतील काळा पैसा कमी झाला नाही, असे निवृत्त निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी तीनच दिवसांपूर्वी सांगितले. त्यांचे म्हणणे खरे असल्याचे दिसते.कोट्यवधींची दारूही पकडली गेलीकेवळ पैशाचेच वाटप होत आहे, असे नसून, तेलंगणात उमेदवारांनी मतदारांना साड्या, शर्ट व पँटचे कापड, भांडी, धान्य याचेही वाटप केले आहे. दारू तर या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाटली गेली की विचारता सोय नाही. मतांसाठी लोकांना दारू प्यायला लावणे, हे फारच झाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणात सर्व मार्गांचा सर्व पक्ष आणि उमेदवारांनी अवलंब केला आहे. काही कोटींची दारूही तेलंगणातील बहुसंख्य मतदारसंघांत पकडली गेली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018