शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

Lockdown : 12 वर्षांची चिमुकली 100 किमी पायी चालली, घर काही अंतरावर असतानाच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:18 IST

जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती.

ठळक मुद्देया चिमुकलीने तीन दिवस केला पायी प्रवासही चिमुकली 2 महिन्यांपूर्वी मिरच्या तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होतीचिमुकलीसोबत आलेल्या सर्वांना करण्यात आले आहे क्वारंटाइन

बिजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये घडली आहे. येथील एक 12 वर्षांची चिमुकली आपल्या काही नातलगांसह तेलंगणातील पेरूर गावी कामासाठी गेली होती. मात्र, लॉकडाऊन-2 नंतर ती गावातीलच आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून बिजापूरच्या दिशेने निघाली. सतत 3 दिवस पायी प्रवास करून ती बिजापूर जिल्ह्यातील मोदकपाल भागात पोहोचली. येथे डिहायड्रेशनमुळे तिचा मृत्यू झाला. या मुलीचा जेथे मृत्यू झाला तेथून तिचे घर केवळ 14 किलोमीटर अंतरावर होते. जमालो मडकाम , असे या चिमुकलीचे नाव आहे.

जमालो मडकाम  ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिर्ची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली. ती जवळपास 100 किलोमीटर पायी चालली. हे 12 जण 18 एप्रिलला बिजापूरमधील मोदकपाल येथे पोहोचले होते.

या घटनेनंतर सुरक्षितता म्हमून प्रशासनाने या सर्व मजुरांना क्वारंटाइन केले आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील आंदोराम मडकाम  आणि आई सुकमती मडकाम जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मृत्यूच्या तीन दिवसांनंतर आज संबंधित मुलीचे शवविच्छेदन झाले. यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. जमालोच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, जमालोला उल्टी-जुलाब झाले, तिच्या पोटातही दुखत होते.

बिजापूर येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बीआर पुजारी यांनी सांगितले, तेलंगणाहून पायी आलेल्या मजुरांच्या गटातील एका मुलीचा मृत्यू झाला असल्याचे समजताच संबंधित मुलीचा मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सुरक्षितता मंहणून संबंधित मुलीचे सॅम्पलदेखील कोरोना टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गर्मीमुळे शरिरातील इलेक्ट्रॉल इम्बॅलेन्स अथवा पाण्याच्या कमतरतेमुळे तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChhattisgarhछत्तीसगडIndiaभारतTelanganaतेलंगणाLabourकामगार