शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : 12 वर्षांची चिमुकली 100 किमी पायी चालली, घर काही अंतरावर असतानाच झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:18 IST

जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती.

ठळक मुद्देया चिमुकलीने तीन दिवस केला पायी प्रवासही चिमुकली 2 महिन्यांपूर्वी मिरच्या तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होतीचिमुकलीसोबत आलेल्या सर्वांना करण्यात आले आहे क्वारंटाइन

बिजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये घडली आहे. येथील एक 12 वर्षांची चिमुकली आपल्या काही नातलगांसह तेलंगणातील पेरूर गावी कामासाठी गेली होती. मात्र, लॉकडाऊन-2 नंतर ती गावातीलच आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून बिजापूरच्या दिशेने निघाली. सतत 3 दिवस पायी प्रवास करून ती बिजापूर जिल्ह्यातील मोदकपाल भागात पोहोचली. येथे डिहायड्रेशनमुळे तिचा मृत्यू झाला. या मुलीचा जेथे मृत्यू झाला तेथून तिचे घर केवळ 14 किलोमीटर अंतरावर होते. जमालो मडकाम , असे या चिमुकलीचे नाव आहे.

जमालो मडकाम  ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिर्ची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली. ती जवळपास 100 किलोमीटर पायी चालली. हे 12 जण 18 एप्रिलला बिजापूरमधील मोदकपाल येथे पोहोचले होते.

या घटनेनंतर सुरक्षितता म्हमून प्रशासनाने या सर्व मजुरांना क्वारंटाइन केले आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील आंदोराम मडकाम  आणि आई सुकमती मडकाम जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मृत्यूच्या तीन दिवसांनंतर आज संबंधित मुलीचे शवविच्छेदन झाले. यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. जमालोच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, जमालोला उल्टी-जुलाब झाले, तिच्या पोटातही दुखत होते.

बिजापूर येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बीआर पुजारी यांनी सांगितले, तेलंगणाहून पायी आलेल्या मजुरांच्या गटातील एका मुलीचा मृत्यू झाला असल्याचे समजताच संबंधित मुलीचा मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सुरक्षितता मंहणून संबंधित मुलीचे सॅम्पलदेखील कोरोना टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गर्मीमुळे शरिरातील इलेक्ट्रॉल इम्बॅलेन्स अथवा पाण्याच्या कमतरतेमुळे तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChhattisgarhछत्तीसगडIndiaभारतTelanganaतेलंगणाLabourकामगार