शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 4:09 PM

देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे

ठळक मुद्देदेशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतातलोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी माहिती दिलीजमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये उशीर होत आहे

नवी दिल्ली, दि. 3 - देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या पुलांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. लोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. 

आपल्या मंत्रालयाने देशभरातील 1.6 लाख पुलांचं सेफ्टी ऑडिट केलं असून, 100 हून अधिक बांधकामं जीर्ण मोडकळीच्या अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. हे 100 पूल कधीही कोसळण्याची भीती असून, त्यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असं गडकरी बोलले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली.

यावेळी नितीन गडकरी यांनी सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला  बुधवारी एक वर्ष पूर्ण झालं. गतवर्षी २ ऑगस्टला महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बस आणि एक टव्हेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता.  

'यापुढे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी माझ्या मंत्रालयाने सर्व पुलांची माहिती घेण्यासाठी विशेष प्रोजक्ट लाँच केला होता',  अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये होत असलेला उशीर यावर बोलताना गडकरींनी हा उशीर जमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे होत असल्याचं सांगितलं. 

सावित्री पूल पाच महिन्यात पुन्हा उभा राहिलासावित्री पूल दुर्घटनेची दखल घेऊन भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याच ठिकाणी सहा महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे पुलाचे काम पाच महिन्यांमध्येच पुर्ण करण्यात आले. तीन पदरी आणि 239 मीटर लांबीच्या या पुलाचं नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

हा पूल बारा गाळ्यांचा, तीन पदरी आणि पदपथासह सोळा मीटर रुंदीचा आहे. साधारणत: या मोजमापाचा पूल पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या पुलाचे महत्त्व विचारात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत पूल उभा करण्यात येईल असे जाहीर केले होते. निविदेमध्येही तशी अट टाकण्यात आली होती. एल अँड टी या ठेकेदार कंपनीने हे आव्हान स्वीकारत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करून पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण केले. या पुलाच्या बांधकामासाठी 35.77 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.