शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

पत्नीला १० कोटी मिळाले; मुख्यमंत्री म्हणे, सिद्ध करा, काँग्रेसचे आरोप सरमा यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:50 IST

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली/गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे म्हणत सरमा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

अनुदान मिळाल्याची कागदपत्रे दाखवत काँग्रेसने दावा केला की, शर्मा २०२१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पत्नी रिंकी भुईंया शर्मा यांच्या कंपनीने ५० बिघा शेतजमीन खरेदी केली आणि या खरेदीनंतर काही दिवसांतच हा भूखंड औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आला.

काय आहेत आरोप?-आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किसान संपदा योजना सुरू केली. परंतु सरमा यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या कंपनीला १० कोटी रुपये मिळवून दिले. -केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का, असा सवाल त्यांनी केला. - पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी दावा केला की, कंपनीच्या संकेतस्थळानुसार, ती कंपनी मीडिया क्षेत्रात काम करते, परंतु किसान संपदा योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अनुदान दिले आहे.

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा