शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गरिबी लॉकडाऊन... १ वर्षाच्या चिमुकल्याने चक्क वडिलांच्या पुतळ्यावर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 10:35 IST

दिल्ली पोलिसांनी सुनिल यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गोरखपूर येथील कुटुंबीयांना दिली. मात्र, गरिबीने पछाडलेल्या या कुटुंबाकडे सुनिल यांचा मृतदेह गावाकडे आणण्यासही पैसै नव्हते

नवी दिल्ली - कोरोना विषाणूला (कोविड-१९) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकदा माणूसकीचे दर्शन होत आहे, तर अनेकदा देशातील गरिबीचे भीषण वास्तव पुढे येत आहे. लॉकडाऊन असल्याने आपल्या गावी, घराकडे जाण्यापासून वंचित राहिलेले मजूर शहरात अडकले आहेत. या शहरांमध्ये सरकारकडून मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय केली जात आहे. मात्र, आजारी असलेल्या मजुरांना रुग्णालयात जाणे शक्य होत नाही. दिल्लीत अशाच एका आजारी असलेल्या स्थलांतरी मजुराने अखेर जीव सोडला. गोरखपूर येथील मजदूर सुनिल (३७) यांचे दिल्ली येथे निधन झाले. मात्र, पतीचा मृतदेह गावाकडे नेण्यासही महिलेकडे पैसे नव्हते. 

दिल्ली पोलिसांनी सुनिल यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गोरखपूर येथील कुटुंबीयांना दिली. मात्र, गरिबीने पछाडलेल्या या कुटुंबाकडे सुनिल यांचा मृतदेह गावाकडे आणण्यासही पैसै नव्हते,आणि लॉकडाऊनही. त्यामुळे पीडित पत्नीने ग्रामपंयातीकडे याबाबत विनंती केली. पण, तेथूनही निराशाच पदरी आली. त्यामुळे पीडिताने चक्क नवऱ्याच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच, मी पतीचा मृतदेह नेऊ शकत नाही, असे म्हणत पोलिसांना शक्क झाले तर त्यांच्या अस्ती पाठविण्याची विनंती केली. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने गोरखपूरमधील संबंधित तहसिलदारांनी दिल्ली पोलिसांनाच सुनिल यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्याचे सूचवले आणि शक्य असेल तर पीडित कुटुंबीयांना अस्ती पाठविण्यात याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र, तहसिलदारांच्या या निरोपामुळे दिल्ली पोलीसही पेचात पडले आहेत. त्यामुळे अद्यापही सुनिल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. 

मूळ डुमरी-खुर्द, चौरी-चौरा येथील सुनिल हे दिल्लीच्या प्रताप नगर भागात एका भाड्याचा खोलीत राहात होते. याच परिसरात ते मोलमजुरीचे काम करत. गावाकडे पत्नी पूनम यांच्यासह ४ मुली आणि १ मुलगा आहे. लॉकडाऊनमुळे सुनिल सध्या दिल्लीतच अडकून पडले होते. त्यातच ते आजारी पडले, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान सफदरगंज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे कुटुंबीया त्यांना फोन करत होते, पण मोबाईल रुमवर असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर, पोलिसांनी सुनिल यांच्या मोबाईलवरुन कुटुंबीयांशी संपर्क साधून मृत्युची बातमी दिली. मात्र, पैसे नसल्याने व लॉकडाऊनमुळे सुनिल यांचे पार्थीव गावाकडे नेऊ शकत नसल्याचे पत्नीने सांगितले. अखेर, आपल्या १ वर्षाच्या मुलाकडून पत्नी पूनम यांनी सुनिल यांचा पुतळा बनवून त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेन गरिब कुटुंबीयांची होणारी हेळसांड पाहून अनेकांच्या ह्दयाचं पाणी-पाणी होत आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीMigrationस्थलांतरणDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस