शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये ९ जिल्ह्यांत १ लाख ८९ हजार लोकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 03:31 IST

लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील नऊ जिल्ह्यांत पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गुरुवारी आणखी एक जण मरण पावला, तर सुमारे १ लाख ८९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.धेमाजी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या नैसर्गिक संकटात आजवर मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे. आसाममध्ये येत्या पाच दिवसांत संततधार कोसळतच राहील. ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, गोलाघाट, जोरहाट, मजुली, शिवसागर, दिब्रुगढ, तीनसुकिया जिल्ह्यांतील ४९२ गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या धेमाजी, मजुली, शिवसागर, तीनसुकिया जिल्ह्यांतील साडेअकरा हजार नागरिकांनी ४९ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १९,४३० हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने नेमातीघाट, धुब्री, तेजपूर येथे तर दिसांग, धनसिरी, जिया भारली या उपनद्यांनी शिवसागर, गोलाघाट, सोनीतपूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिब्रुगढ शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड पाऊस पडल्याने तेथे सर्वत्र पाणी साचले आहे. दिब्रुगढमधील दहा वॉर्डांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावाआसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. पुराचा तडाखा बसलेल्या भागांची माहिती जाणून घेण्यासाठी सोनोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश सोनोवाल यांनी या बैठकीत दिले आहेत.———————>दोन आठवड्यांपूर्वीच मान्सून देशभरातनवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून नियोजित अवधीपूर्वीच देशभर व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर या शेवटच्या ठिकाणी मान्सून पोहोचण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागतात. यावर्षी मात्र वेगाने आगेकूच करीत मान्सून देशभर सर्वत्र पोहोचला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.नैर्ऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अन्य भागांत पोहोचला आहे.असून, मान्सून २६ जून रोजी देशभर व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनने वायव्येकडे कूच केली आहे. मध्य भारतातील चक्रीवादळाच्या संचारामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास मदत मिळाली. ८ जुलै रोजी मान्सून देशभर व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.२०१३ मध्ये मान्सून १६ जून रोजी देशभर व्यापला होता. त्यावेळी उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला होता. यावर्षी मान्सून वेगाने आगेकूच करून देशभर व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राजस्थानमध्ये सर्वत्र पाऊस...नैर्ऋत्य मान्सून राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला असून, विविध ठिकाणी पाऊस झाला. जयपूर येथील हवामान केंद्राचे संचालक शिव गणेश यांनी सांगितले की, अंदाजापेक्षा एक दिवस आधीच २४ जून रोजीच मान्सूनचे राजस्थानात आगमन झाले. राज्यातील सर्व ३३ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस झाला.—————————