शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आसाममध्ये ९ जिल्ह्यांत १ लाख ८९ हजार लोकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 03:31 IST

लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील नऊ जिल्ह्यांत पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गुरुवारी आणखी एक जण मरण पावला, तर सुमारे १ लाख ८९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.धेमाजी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या नैसर्गिक संकटात आजवर मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे. आसाममध्ये येत्या पाच दिवसांत संततधार कोसळतच राहील. ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, गोलाघाट, जोरहाट, मजुली, शिवसागर, दिब्रुगढ, तीनसुकिया जिल्ह्यांतील ४९२ गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या धेमाजी, मजुली, शिवसागर, तीनसुकिया जिल्ह्यांतील साडेअकरा हजार नागरिकांनी ४९ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १९,४३० हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने नेमातीघाट, धुब्री, तेजपूर येथे तर दिसांग, धनसिरी, जिया भारली या उपनद्यांनी शिवसागर, गोलाघाट, सोनीतपूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिब्रुगढ शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड पाऊस पडल्याने तेथे सर्वत्र पाणी साचले आहे. दिब्रुगढमधील दहा वॉर्डांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावाआसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. पुराचा तडाखा बसलेल्या भागांची माहिती जाणून घेण्यासाठी सोनोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश सोनोवाल यांनी या बैठकीत दिले आहेत.———————>दोन आठवड्यांपूर्वीच मान्सून देशभरातनवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून नियोजित अवधीपूर्वीच देशभर व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर या शेवटच्या ठिकाणी मान्सून पोहोचण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागतात. यावर्षी मात्र वेगाने आगेकूच करीत मान्सून देशभर सर्वत्र पोहोचला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.नैर्ऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अन्य भागांत पोहोचला आहे.असून, मान्सून २६ जून रोजी देशभर व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनने वायव्येकडे कूच केली आहे. मध्य भारतातील चक्रीवादळाच्या संचारामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास मदत मिळाली. ८ जुलै रोजी मान्सून देशभर व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.२०१३ मध्ये मान्सून १६ जून रोजी देशभर व्यापला होता. त्यावेळी उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला होता. यावर्षी मान्सून वेगाने आगेकूच करून देशभर व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राजस्थानमध्ये सर्वत्र पाऊस...नैर्ऋत्य मान्सून राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला असून, विविध ठिकाणी पाऊस झाला. जयपूर येथील हवामान केंद्राचे संचालक शिव गणेश यांनी सांगितले की, अंदाजापेक्षा एक दिवस आधीच २४ जून रोजीच मान्सूनचे राजस्थानात आगमन झाले. राज्यातील सर्व ३३ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस झाला.—————————