शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आसाममध्ये ९ जिल्ह्यांत १ लाख ८९ हजार लोकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 03:31 IST

लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील नऊ जिल्ह्यांत पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गुरुवारी आणखी एक जण मरण पावला, तर सुमारे १ लाख ८९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.धेमाजी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या नैसर्गिक संकटात आजवर मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे. आसाममध्ये येत्या पाच दिवसांत संततधार कोसळतच राहील. ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, गोलाघाट, जोरहाट, मजुली, शिवसागर, दिब्रुगढ, तीनसुकिया जिल्ह्यांतील ४९२ गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या धेमाजी, मजुली, शिवसागर, तीनसुकिया जिल्ह्यांतील साडेअकरा हजार नागरिकांनी ४९ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १९,४३० हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने नेमातीघाट, धुब्री, तेजपूर येथे तर दिसांग, धनसिरी, जिया भारली या उपनद्यांनी शिवसागर, गोलाघाट, सोनीतपूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिब्रुगढ शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड पाऊस पडल्याने तेथे सर्वत्र पाणी साचले आहे. दिब्रुगढमधील दहा वॉर्डांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावाआसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. पुराचा तडाखा बसलेल्या भागांची माहिती जाणून घेण्यासाठी सोनोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश सोनोवाल यांनी या बैठकीत दिले आहेत.———————>दोन आठवड्यांपूर्वीच मान्सून देशभरातनवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून नियोजित अवधीपूर्वीच देशभर व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर या शेवटच्या ठिकाणी मान्सून पोहोचण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागतात. यावर्षी मात्र वेगाने आगेकूच करीत मान्सून देशभर सर्वत्र पोहोचला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.नैर्ऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अन्य भागांत पोहोचला आहे.असून, मान्सून २६ जून रोजी देशभर व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनने वायव्येकडे कूच केली आहे. मध्य भारतातील चक्रीवादळाच्या संचारामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास मदत मिळाली. ८ जुलै रोजी मान्सून देशभर व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.२०१३ मध्ये मान्सून १६ जून रोजी देशभर व्यापला होता. त्यावेळी उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला होता. यावर्षी मान्सून वेगाने आगेकूच करून देशभर व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राजस्थानमध्ये सर्वत्र पाऊस...नैर्ऋत्य मान्सून राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला असून, विविध ठिकाणी पाऊस झाला. जयपूर येथील हवामान केंद्राचे संचालक शिव गणेश यांनी सांगितले की, अंदाजापेक्षा एक दिवस आधीच २४ जून रोजीच मान्सूनचे राजस्थानात आगमन झाले. राज्यातील सर्व ३३ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस झाला.—————————