शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

जोधपूर, बिकानेरमध्ये महिन्यात ३०८ अर्भकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:42 IST

राजस्थानमधील जोधपूर व बिकानेरमधील रुग्णालयांमध्ये डिसेंबर महिन्यात ३०८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर व बिकानेरमधील रुग्णालयांमध्ये डिसेंबर महिन्यात ३०८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील शासकीय रुग्णालयात अर्भकांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्यात असंतोष वाढत असतानाच त्या राज्यातील अन्य ठिकाणचीही विदारक स्थिती उजेडात आली आहे.बुंदी येथील एका रुग्णालयातही डिसेंबर महिन्यात १० अर्भकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जोधपूर व बिकानेरमध्येही अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने विरोधकांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. जोधपूरमधील उमेद व एमडीएम रुग्णालयामध्ये डिसेंबर महिन्यात १४६ अर्भके मरण पावली. त्यातील १०२ नवजात बालकांचा अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एस. एन. मेडिकल कॉलेजने तयार केलेल्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात या मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एस. एन. राठोड यांनी सांगितले की, २०१९ यावर्षी या दोन्ही रुग्णालयांत दाखल झालेल्या ४७,८१५ अर्भकांपैकी ७५४ जण दगावले. याच रुग्णालयांत डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या ४,६८९ मुलांपैकी १४६ जण मरण पावले होते. त्यातील बहुतांश अर्भकांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जोधपूर जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमधून त्यांना उमेद व एमडीएम रुग्णालयांत हलविण्यात आले होते. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पश्चिम राजस्थानमधील रुग्णालयांवर मोठा भार पडत आहे. जोधपूरमधील दोन्ही रुग्णालयांमध्ये अपुऱ्या वैद्यकीय सेवा असल्याच्या आरोपाचा राठोड यांनी इन्कार केला. बिकानेरमधील सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीबीएम रुग्णालयामध्ये डिसेंबर महिन्यात १६२ अर्भकांचा अतिदक्षता कक्षामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एच. सी. कुमार यांनी सांगितले की, या रुग्णालयांत अर्भकांवर योग्य उपचार करण्यात येतात. त्याबाबतकोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. (वृत्तसंस्था)>कोटातील रुग्णालयाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणीकोटा येथील जे. के. लोन रुग्णालयात गेल्या महिनाभरात दगावलेल्या अर्भकांची संख्या आता ११० झाली आहे. शनिवारी हा आकडा १०७ होता. मात्र, रविवारी आणखी तीन अर्भक दगावले.राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी लोन रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. पायलट यांनी सांगितले की, अर्भकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यांच्यावर नीट उपचार व्हावेत यासाठी सर्वांनीच दक्ष राहायला हवे होते.>राजकोटमध्ये १११ नवजात बालकांचा मृत्यूगुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील सामान्य इस्पितळात डिसेंबर महिन्यात १११ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद सामान्य रुग्णालयातही मागच्या महिन्यात ८८ नवजात बाळांचा मृत्यू झाला.गुजरातमधील सामान्य रुग्णालयात डिसेंबरमध्ये शंभराहून अधिक नवजात बाळांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताबाबत पत्रकारांनी वडोदरा येथे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना विचारले असता उत्तर न देता ते निघून गेले.