शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 7:38 PM

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात

ठळक मुद्देसरकार राजी : मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अवलंबून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असून, या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट घेतली आहे. मुदतवाढीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असून, याच दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व रणधुमाळी असणार आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविल्यास त्यातून पक्षांतर्गत राजी-नाराजी उफाळून येण्याची व त्यातून सत्तेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाºया जिल्हा परिषदांच्या पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ दिली जावी, असा मतप्रवाह राज्यातील विद्यमान पदाधिकाºयांचा आहे. त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जवळपास अडीच महिने कोणतेही भरीव कामकाज जिल्हा परिषदांमध्ये होऊ शकले नाही. जून व जुलै महिना वगळता आॅगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाºयांना त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाप्रमाणे कमी महिनेच कामकाजासाठी मिळणार आहेत. त्याचा विचार करता सहा महिने मुदतवाढ दिल्यास पदाधिकाºयांना निवडणुकीच्या तोंडावर खूष ठेवता येणे शक्य होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन उपरोक्त बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या या मताशी राज्यकर्त्यांनीही सहमती दर्शविली असून, त्यासाठी अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा व त्यानंतर विधीमंडळ अधिवेशनात कायदा मंजूर करून घ्यावा लागणार आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील उपरोक्त हालचालींना दुजोरा दिला असून, सरकारा याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तथापि, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र इंकार केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद