शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:42 AM

शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.

ठळक मुद्देशीतल सांगळे : उपाययोजना करण्याचे दिले आदेश

नाशिक : शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.पाणीटंचाईबाबत मंगळवारी येवला येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी दराडे, तहसीलदार वारोळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी शीतल सांगळे यांनी पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करून याबाबतचे सर्व गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. गिते यांनी विंधन विहिरींचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे तसेच याकामी हलगर्जीपणा केल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ३८ गाव पाणीपुरवठा योजना, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, चाराटंचाई आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या २१ टँकर सुरू असून, त्याद्वारे ३६ गाव व २६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखीही टँकर लागणार असतील तर त्याचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.अंदरसूल येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मार्गदर्शन करताना डॉ.गिते यांनी या योजनेच्या पाइपलाइनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.बैठकीस पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, उपसभापती रूपचंद भागवत, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, पंचायत समिती सदस्य कांतीलाल साळवे, भूजल विकास यंत्रणेचे बेडवाल, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई