शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:29 IST

येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन.

येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले. जून २०२० मध्ये केंद्र सरकार शेतकरी हिताचे तीन अध्यादेश काढते, कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतुन काढला त्या आध्यादेशाचे शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांकडून स्वागतही केले होते. पण अटी शर्तीचा गैरफायदा घेऊन अचानक कांदा निर्यात बंदी घोषित करते याला काय म्हणायचे असा सवाल करून, ही दुटप्पी भूमिका म्हणजे शेतकºयांच्या पाठित खंजीर खुपसला अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी त्वरित कांदा निर्यात चालु करावी अन्यथा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करेन असा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अरूण जाधव, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, संध्या पगारे, शिवाजी वाघ,जाफरभाई पठाण, विठ्ठल वाळके, अनिस पटेल, योगेश सोमवंशी, आनंदा महाले आदींसह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा