शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

गेल्या वर्षाच्या पीक नुकसानीची यंदा भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:24 AM

गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी यंदा २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्णातील २६ हजार शेतकºयांना या रकमेचे वाटप केले जाणार आहे.

नाशिक : गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी यंदा २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्णातील २६ हजार शेतकºयांना या रकमेचे वाटप केले जाणार आहे.  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामार्फत सदरची आर्थिक मदत गेल्या वर्षीच शासनाने जाहीर केली होती. त्यात प्रामुख्याने अतिवृष्टी वा अवकाळी पावसाने शेती पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांनाच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या काळात नाशिक विभागातच अनेक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावून नेला होता. एप्रिल महिन्यातील पावसाने खळ्यावर काढून ठेवलेल्या शेतकºयांच्या उन्हाळ कांद्याचे अतोनात नुकसान केले होते. त्याचबरोबर उशिराच्या द्राक्षबागांचेही त्यामुळे नुकसान झाले होते. सप्टेंबर व आॅक्टोबरच्या पावसाने खरिपाची उभी असलेली पिके जमीनदोस्त केली होती. त्यामुळे नाशिक विभागातील ६९,४६७ शेतकºयांच्या ३३,३५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात नाशिक जिल्ह्यातील २६,८८३ शेतकºयांच्या १३,८७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.विभागासाठी ४० कोटी ५८ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार