शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा त्र्यंबकेश्वरला मुबलक पाणी

By admin | Updated: February 27, 2017 01:02 IST

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे.

त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील जलाशय दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आटू लागतात; यावर्षी फेब्रुवारी अखेरही तीनही जलाशयात पाण्याचा भरपूर साठा असल्याचे दिसून येते. अहल्या धरण, अंबोली धरण व गौतमी-गोदावरी प्रकल्पातील त्र्यंबकेश्वर शहरासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा भरपूर असल्याने पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लढ्ढा यांनी अहल्या धरणाची खोली वाढविण्याचे काम हाती घेतले असून, नगरसेवकांनीही यात सहभाग नोंदविला आहे. पावसाळ्यात परिसरातील डोंगरांवरून वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती, कचरा धरणपात्रात येऊ नये म्हणून धरणापासून काही अंतरावर बांध घातले गेल्याने मागील वर्षी धरणातील पाणी स्वच्छ होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाणदेखील जास्त होते. मागील आॅगस्ट महिन्यात सतत २/३ दिवस झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्व जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यंदा पाण्याची स्थिती उत्तम आहे. बेझे धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत असून, याबाबत बेझेवासियांचीदेखील तक्र ार आहे. तथापि, संबंधित शाखा अभियंत्याच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरसाठी पाणी कमी पडणार नाही. शहराला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असे म्हटले जात असले तरी खासगी व बेकायदा मोटारी लावून बेसुमार पाणी उपसा होत राहिला तर पाणीटंचाई नक्की भासणार आहे. शासनाने बेकायदा पाणी उपशाला पायबंद घालावा, अंबोली धरण ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा केंद्रापर्यंत लावण्यात आलेल्या एअर व्हॉल्हमधून होणारी गळती थांबवावी, पाणीबचतीसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी चेतना मानुरे केरु रे व पाणीपुरवठा सभापती यांनी आतापासूनच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)