शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:10 AM

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी ...

ठळक मुद्दे४३० कुटुंबांचे स्थलांतर महिनाअखेर ताबा जलसंपदा विभागाकडे

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले.परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रुपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमिनीवर असलेली पिके, घर, गोठ्यांचेही मूल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादित करण्यात आली. परंतु पुनर्वसनाच्या प्रश्नी काम धीम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पूर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनर्वसनासाठी धरणाच्या बाजूलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादित करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणाºया खर्चातही दरवर्षी वाढ होत होती. ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे.प्रोत्साहन अनुदानजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.नाशिकला पाणी मिळण्याविषयी साशंकतासाधारणत: २.६० टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या भाम धरणातील पाणी दारणा धरणातून नांदूरमधमेश्वरमार्गे नगर व मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे. नाशिक शहराला या पाण्याचा लाभ होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असली तरी, जनभावना लक्षात घेता जलसंपदा विभाग नाशिक जिल्ह्याला या धरणातून पाणी मिळेल असा दावा करीत असून, नेमके किती व कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट झालेले नाही.