शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम - भास्करराव पेरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:58 PM

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

निफाड : गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.  शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने निफाड येथे रविराज मंगल कार्यालयात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प भास्करराव पेरे पाटील यांनी ‘स्मार्ट व्हिलेज काळाची गरज’ या विषयावर गुंफले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे प्रायोजक अनिल कुंदे , मनोज आहेरराव होते.यावेळी भास्करराव पेरे म्हणाले, प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज करायचे असेल तर यासाठी गावातील नागरीकांचे सहकार्य अपेक्षीत असते , मात्र नागरीकांना प्रेमाने हाताळणारे सत्ताधारी सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. सरपंचांनी आमदार , खासदार यांच्या भरवशावर न बसता स्वत: गावच्या विकासासाठी प्रामाणीकपणे झटल्यास त्यांचे गाव स्मार्ट व्हिलेज झाल्याशिवाय राहणार नाही. गावातील सत्ताधाºयांनी जनतेशी चांगले संबध ठेऊन काम करावे . त्यामुळे गावच्या विकासासाठी जनताही सहकार्य करते. जर गावागावात शौचालय, गटारी , पिण्याचे पाणी , वृक्षारोपण , या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते गाव नक्कीच विकास करू शकते. प्रत्येक नागरिकाने गावच्या व स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास देशाच्या बाबतीत ही बाब प्रगतीची ठरेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ झाडे लावली पाहीजे. महिलांना सन्मानाची वागणुक द्या महिला जे कष्ट करतात त्याची जाणीव ठेवा असेही त्यांनी सांगितले. प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले.  आभार प्रदर्शन अनिल कुंदे यांनी केले . सूत्रसंचलन सुनील कुमावत यांनी केले. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचSmart Cityस्मार्ट सिटी