शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पळसे येथील पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:00 PM

नाशिकरोड : पळसे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम अद्यापपर्यंत ठेका घेतलेल्या चेतक कंपनीने केले नसल्याने येणाºया पावसाळ्यात पळसेकरांचे मोठे हाल होणार आहेत.

नाशिकरोड : पळसे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम अद्यापपर्यंत ठेका घेतलेल्या चेतक कंपनीने केले नसल्याने येणाºया पावसाळ्यात पळसेकरांचे मोठे हाल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच अजित गायधनी यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे, चेतक कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले याची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व्हिस रोडवर पथदीप बसवावे यांसह इतर समस्यांवर सकारात्मक चर्चा करून प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.पळसे गावातून जाणाºया स्मशानभूमी रस्त्याची गेली पाच ते सहा वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून, या रस्त्यावर पुलाचीअनेक दिवसांची मागणी असतानादेखील पळसेकरांना केवळ आश्वासनच मिळत होते. या सर्व्हिस रोडवर कुठल्याही प्रकारचे पथदीप नाही तसेच स्मशानभूमीकडे जाणाºया मुख्य रस्त्याचे व पुलाचे काम सुरू केले नव्हते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलाचे काम सुरू करून सर्व्हिस रोडवर पथदीप बसवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विभागीय उपअभियंता सी. आर. सोनवणे, मनोज पाटील, सुनील भोसले, सरपंच अजित गायधनी, गणेश गायधनी, शाखा अभियंता सतीश आहेर, स्वप्नील पाटील यांची संयुक्त बैठक पार पडून पुलाचे काम त्वरित सुरू करावे, पथदीप बसवावे व इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी चेतक कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी दिलीप गायधनी, संदीप गायधनी, संजय डहाळे, समाधान गायधनी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक