शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:37 IST

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे.

वणी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. देवसाणे, चौसाळे, चारणवाडी, सारसाळे, करंजखेड, एकलहरा, पिंगळवाडी, खोरी ही आदिवासी बहुल गावे असून, या व लगतच्या भागातील शेतजमिनीतील विहिरींनी तळ गाठला आहे.शेती व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करायचे ही समस्या उभी ठाकली आहे. ग्रामस्थांनाही पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते आहे. सद्यस्थितीत एकलहरा व करंजाळी येथील धरणातून ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे; मात्र धरणसाठ्याची पाण्याची पातळी पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरी खोदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली.एक परस म्हणजेच सात फूट विहीर खोदण्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च येतो. काही भागात पाणी जमिनीत किती फुटावर लागू शकते याच्या चाचपणीसाठी अधिक खोदकामही करावे लागते. सदर खर्चाचा आवाका मोठा असल्याने आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना हा खर्च पेलणारा नाही.जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने धरणालगतच्या क्षेत्रातील पाण्याचा वापर सध्या करावालागतो आहे. जनावरांना चारा नसल्याने गव्हाचा तुस व भाताचा कोंडा याचा वापर करावा लागतो आहे. हिरवा चारा दाट जंगली भागात असला तरी बिबट्या अस्वल, या जंगली श्वापदांच्या भीतीमुळे जनावरांना मोकळे सोडता येत नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.पशुपालक हवालदिलजनावरांना चारा-पाणी अत्यल्प असून, त्यांची भूक भागविण्यासाठी जंगलातही सोडता येत नसल्याने डोळ्यादेखत गुरांचे हाल पाहण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही या भागात पाचवीला पूजलेली, हा प्रतिवर्षीचा अनुभव आहे; मात्र ठोस उपाययोजनेअभावी आदिवासी भागाची परवड सुरूच असून, मागील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने स्वत:च्या शेती व्यवसायासाठी पाणी वापरले नाही. ते पाणी जनतेसाठी टँकरच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती संगीता राऊत यांनी दिली. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाºया ग्रामस्थांसाठीची समस्या सोडविणेकामी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईNashikनाशिक