शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:37 IST

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे.

वणी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. देवसाणे, चौसाळे, चारणवाडी, सारसाळे, करंजखेड, एकलहरा, पिंगळवाडी, खोरी ही आदिवासी बहुल गावे असून, या व लगतच्या भागातील शेतजमिनीतील विहिरींनी तळ गाठला आहे.शेती व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करायचे ही समस्या उभी ठाकली आहे. ग्रामस्थांनाही पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते आहे. सद्यस्थितीत एकलहरा व करंजाळी येथील धरणातून ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे; मात्र धरणसाठ्याची पाण्याची पातळी पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरी खोदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली.एक परस म्हणजेच सात फूट विहीर खोदण्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च येतो. काही भागात पाणी जमिनीत किती फुटावर लागू शकते याच्या चाचपणीसाठी अधिक खोदकामही करावे लागते. सदर खर्चाचा आवाका मोठा असल्याने आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना हा खर्च पेलणारा नाही.जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने धरणालगतच्या क्षेत्रातील पाण्याचा वापर सध्या करावालागतो आहे. जनावरांना चारा नसल्याने गव्हाचा तुस व भाताचा कोंडा याचा वापर करावा लागतो आहे. हिरवा चारा दाट जंगली भागात असला तरी बिबट्या अस्वल, या जंगली श्वापदांच्या भीतीमुळे जनावरांना मोकळे सोडता येत नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.पशुपालक हवालदिलजनावरांना चारा-पाणी अत्यल्प असून, त्यांची भूक भागविण्यासाठी जंगलातही सोडता येत नसल्याने डोळ्यादेखत गुरांचे हाल पाहण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही या भागात पाचवीला पूजलेली, हा प्रतिवर्षीचा अनुभव आहे; मात्र ठोस उपाययोजनेअभावी आदिवासी भागाची परवड सुरूच असून, मागील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने स्वत:च्या शेती व्यवसायासाठी पाणी वापरले नाही. ते पाणी जनतेसाठी टँकरच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती संगीता राऊत यांनी दिली. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाºया ग्रामस्थांसाठीची समस्या सोडविणेकामी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईNashikनाशिक