शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
5
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
6
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
7
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
8
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
9
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
10
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
11
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
12
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
13
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:29 IST

येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले असून, विहिरींनी, बोअरवेलने तळ गाठला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. आपली तहान भागवण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणावे लागत असल्याने लहान मुलांसह वृद्धांनाही कसरत करावी लागत आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे पिण्यासाठी तरी पाणी मिळेल का नाही, असा प्रश्न आहे. संपूर्ण तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सध्या ग्रामीण भागात सण, उत्सव, लग्नसराई कार्यक्रमाकरिता घरी आल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यात भर म्हणून भारनियमनाच्या वेळेत वाढ झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यात आज २९ गावे व २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत रोजच भर पडत आहे. गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विहिरी कूपनलिकेची पातळी खालावल्याने अनेक जलस्रोत पाण्याअभावी बंद पडले आहेत. तसेच नागरिकांसह मुक्या जनावरांना तसेच पशुपक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेली आहे. असे असतानाही शेतकºयांनी बोअरवेल घेऊन जमिनीची चाळण केली आहे. मात्र पाणी लागत नाही एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊनही पाणी लागत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार अशी अवस्था झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही नदी-नाले, ओढे, साठवण तलाव पाण्याने भरलेच नाही त्यामुळे पाण्याचा ठणठणात आहेत. त्यातच पाण्याच्या व्यवस्थेसाठी टँकरच्या, कूपनलिका अधिग्रहणाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील साठवण तलावातील पाण्याचे योग्य ते नियोजन न केल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एवढी भीषण परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.दूषित पाण्याने आरोग्य धोक्यातयेवला तालुक्यात विहिरी, कूपनलिकांची पातळी कमालीची खालावल्याने व ना दुरुस्त कूपनलिकांची संख्या अधिक वाढल्याने पाणीटंचाईत भरच पडत आहे. तालुक्यात दूषित जलस्त्रोतांचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो. येवला तालुक्यात विहिरी, विंधनविहिरी आदी स्रोतांचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापर असतात. मात्र तालुक्यात अस्तित्वात असणाºया हातपंपाचे पाणी दूषित, क्षारयुक्त झालेले आहे असे पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई व दूषित जलसाठा यामुळे ग्रामीण भागातील नागरिकदेखील जारचे, फिल्टर केलेले पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत शुद्ध ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जलदुतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई