शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य मेळाव्यात महिला दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:40 IST

साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देसुनंदा पाटील : महिला साहित्य मेळावा

एकलहरे : साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले.शारदा बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित महिला साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा पाटील बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा शारदा गायकवाड, स्वागताध्यक्ष विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, किशोर पाठक, विद्या फडके, सुनीता मुरकेवार, भीमराव कोते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनंदा पाटील म्हणाल्या की, अपत्य जन्म व संसारात गुरफटलेल्या स्त्रियांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना व्यक्त होताना संकोचाचा पडदा असतो. त्यामुळे स्त्रियांची लेखणी थांबते. लोकगीतातून स्त्रिया दु:ख, भावना व्यक्त करतात. त्या बोलल्या नाहीत तर त्यांच्या व्यथा समजणारच नाहीत. परंतु, आता स्त्री मोकळी होत आहे. आवड असेल तर सवड मिळते. स्त्रियांनी कथा, कविता, कादंबऱ्या, लेख लिहावेत. स्त्रियांनी घरातील विरोध मोडून आपली ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त केल्यास साहित्यात चांगली भर पडेल. स्त्रियांनी घराच्या मर्यादा ओलांडू नये, परंतु मागेही राहू नये. ज्या गोष्टी मानसिकतेत आहेत तेथे लेखणी चालवावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले यांनीही मार्गदर्शन केले. शारदा गायकवाड यांनी प्रास्ताविक तर अंजना भंडारी व सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन अलका कोठावदे यांनी केले.दिवसभर चाललेल्या या संमेलनात गीतमैफल, कविता संमेलन व अन्य कार्यक्रम झाले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच अर्पणा क्षेमकल्याणी, माया दामोदर (शेगाव), सुवर्णा जाधव (मुंबई), सपना नेर, शैलजा करोडे (पुणे), रचना (नगर) यांना यमुनाई पुरस्काराने गौरविण्यात आले. रघुनाथ कोठावदे, रजनी बारसे, अलका कोठावदे, जालिंदर गायकवाड, जयश्री जांभळे, नंदकिशोर ठोंबरे, राजेंद्र चिंतावार, दत्ता दाणी आदींंसह महिला साहित्यिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य