शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

प्रबोधनाचे यश !

By किरण अग्रवाल | Updated: September 16, 2018 01:54 IST

सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त्याचे यश अवलंबून असते.

सुधारणेच्या गोष्टी कितीही सांगा, पण बऱ्याचदा पालथ्या घड्यावर पाणी... असाच अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले जाते. काहीअंशी ते खरेही आहे, मात्र तुम्ही प्रबोधनाचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे करता आणि कोणासमोर करता याला खूप महत्त्व असते; किंबहुना त्यावरच त्याचे यश अवलंबून असते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या बाबतीत तेच अनुभवास येत आहे ही बाप्पांचीच कृपा म्हणावी.बाप्पांचा उत्सव पर्यावरणपूरक ठरावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला बºयाचअंशी यशही लाभत असून, ‘पीओपी’च्या मूर्तीऐवजी शाडूमातीच्या मूर्तीची मागणी वाढलेली दिसून आली. जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ही बाब खूपच महत्त्वाची ठरते आहे. विशेषत: शाळा-शाळांमधून याबाबत प्रबोधन केले गेले व शाडूमातीच्या मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या. त्यामुळे मुलांनीच निर्णय घेऊन आपापल्या घरात शाडूमातीच्या मूर्तींची स्थापना करण्यात पुढाकार घेतल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे, यावर्षी तर त्याही पुढचे पाऊल टाकत मातीऐवजी कापूस, कागदापासून बनविलेल्या ‘इको-फ्रेण्डली’ गणेशमूर्ती साकारल्या गेल्याचेही बघावयास मिळाले. पूर्वी मखर वा सजावटीत मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होताना दिसे, यंदा त्यातही लगाम बसलेला दिसत आहे. दुसरे म्हणजे, स्वच्छ व सुंदर गाव अथवा तंटामुक्त गाव योजनेप्रमाणेच ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना राबविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून, त्यासही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे एक हजारपेक्षा अधिक गावांमध्ये ‘एक गणपती’ स्थापन करण्यात आले आहेत, हे मोठेच यश असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी त्यासाठी केलेली जनजागृती कामी आली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक