शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

परतीच्या पावसाने वाईन ग्रेप्सलाही फटका, 10 ते 15 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 19:22 IST

गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे.

ठळक मुद्देवाईन पंढरी नाशिकला परतीच्या पावसाचा फटका वाईन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

नाशिक : गेल्या काही वर्षांत गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले तरी यावर्षी लांबलेला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमध्ये टेबल ग्रेप्ससोबतच वाइन ग्रेप्सलाही काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी वाइन उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वाइन उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. द्राक्षाची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये वायनरी उद्योग बहरल्याने या शहराने जगभरात ‘वाइन कॅपिटल’ अशी ख्याती मिळविली आहे. या वाइन उद्योगाच्या वाढत्या विस्तारामुळे वाइन ग्रेप पिकविणाऱ्या उत्पादकांनाही चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असून, गारपीट व बेमोसमी पाऊस अथवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाइन उद्योग नाशिकमधील द्राक्षशेतीला नवसंजीवनी देणारा ठरतो आहे. परंतु, यावर्षी वाइन ग्रेप्सलाही परतीच्या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. बागांमधील छाटणीचा कालावधी मागे-पुढे होण्यासोबतच द्राक्षांचे घड फुलोऱ्यात जिरण्याच्या प्रकारामुळे वाइन ग्रेप्सच्या उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात साधारणत: सन २००० पासून वाइन उद्योग बहरला असून, देशात द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय पोषक वातावरण असल्याने विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांनी जागतिक दर्जाच्या द्राक्ष उत्पादनाला सुरुवात केली. देशातील द्र्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ५० टक्के वाटा महाराष्ट्रातून येतो. यातील ७० टक्के उत्पादन केवळ नाशिकमध्ये घेतले जाते. नाशिक परिसरात सुमारे तीन ते साडेतीन हजार एकरवर वाइन ग्रेप्सचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत हार्वेस्टींग होणाऱ्या १५ ते १७ हजार टन द्राक्षांपासून सुमारे सव्वा ते दीड कोटी लिटर वाइनचे उत्पादन घेतले जाण्याचा अंदाज ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजी अहेर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकRainपाऊस