शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कांदा उत्पादकांना रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : हवामान बदलामुळे उत्पादनात घट; बाजारभावाच्या चढ-उताराची धास्ती

गोरख घुसळे।पाटोदा : गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.चांगला दर हाती लागावा म्हणून शेतकरी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणत आहेत. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होत असून, औषधे फवारणीचा खर्च डोईजड होताना दिसत आहे. बाजारभावातील चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेतात उपलब्ध असलेला कांदाविक्र ीवर भर दिला आहे.खरीप कांद्यापाठोपाठ रब्बी रांगडा कांदा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही ढगाळ हवामान, धुके व दवामुळे खराब झाली आहेत. त्यांच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. रब्बीच्या गहू, हरभराप्रमाणेच कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पोळ कांदा शेतातच सडून गेल्याने कांदा दरात अचानक वाढ झाली. रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपेही या पावसाने सडून गेल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येवला तालुक्यासह निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या भागातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा रोपांना सोन्याचा भाव आला आहे. मिळेल त्या दराने शेतकºयांनी रोपे खरेदी केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांदा पिवळा पडत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा निम्मे उत्पादनदेखील हाती लागले नाही.कांदा विक्रीवर शेतकºयांचा भरकांदा लागवड, मजुरी व कीटकनाशक फवारणीचा खर्च लाखात गेला आहे. आज मिळणारा बाजारभाव पाहता शेतकºयांना जास्तीचा दर मिळत आहे असे दिसत असले तरी ते खर्चाच्या हिशेबाने कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कांद्याच्या दरात चार हजारांनी घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. बाजारभावातीलचढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकºयांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा विक्र ीवर भर दिला आहे.सुमारे साठ हजार रुपयांची कांदा रोपे विकत आणून एक एकर कांदा लागवड केली. मजुरी, लागवड खर्च, मशागत असा सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. त्यात बाजारभावात चढ-उतार सुरू असल्याने कांदा उत्पादनासाठी केलेला लाखाचा खर्च वसूल होईल का? याची चिंता आहे.- सुरेश शेलकी,कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगावकांदा लागवडीसाठी सुमारे चारवेळा बियाणे टाकली. अवकाळी पावसाने लागवडकेलेला पोळ कांदा व दुसºयांदा टाकलेले कांदा रोप खराब झाले. तिसºयांदा टाकलेले उळे दाट धुके व दवामुळे खराब झाले. आतापुन्हा बियाणे टाकली असून, बदलत्या वातावरणामुळे त्याचीही शाश्वती राहिलेली नाही. बियाणांसाठी मोठा खर्च झाला आहे.- प्रभाकर बोरणारे,शेतकरी पाटोदा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा