शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कांदा उत्पादकांना रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : हवामान बदलामुळे उत्पादनात घट; बाजारभावाच्या चढ-उताराची धास्ती

गोरख घुसळे।पाटोदा : गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.चांगला दर हाती लागावा म्हणून शेतकरी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणत आहेत. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होत असून, औषधे फवारणीचा खर्च डोईजड होताना दिसत आहे. बाजारभावातील चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेतात उपलब्ध असलेला कांदाविक्र ीवर भर दिला आहे.खरीप कांद्यापाठोपाठ रब्बी रांगडा कांदा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही ढगाळ हवामान, धुके व दवामुळे खराब झाली आहेत. त्यांच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. रब्बीच्या गहू, हरभराप्रमाणेच कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पोळ कांदा शेतातच सडून गेल्याने कांदा दरात अचानक वाढ झाली. रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपेही या पावसाने सडून गेल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येवला तालुक्यासह निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या भागातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा रोपांना सोन्याचा भाव आला आहे. मिळेल त्या दराने शेतकºयांनी रोपे खरेदी केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांदा पिवळा पडत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा निम्मे उत्पादनदेखील हाती लागले नाही.कांदा विक्रीवर शेतकºयांचा भरकांदा लागवड, मजुरी व कीटकनाशक फवारणीचा खर्च लाखात गेला आहे. आज मिळणारा बाजारभाव पाहता शेतकºयांना जास्तीचा दर मिळत आहे असे दिसत असले तरी ते खर्चाच्या हिशेबाने कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कांद्याच्या दरात चार हजारांनी घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. बाजारभावातीलचढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकºयांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा विक्र ीवर भर दिला आहे.सुमारे साठ हजार रुपयांची कांदा रोपे विकत आणून एक एकर कांदा लागवड केली. मजुरी, लागवड खर्च, मशागत असा सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. त्यात बाजारभावात चढ-उतार सुरू असल्याने कांदा उत्पादनासाठी केलेला लाखाचा खर्च वसूल होईल का? याची चिंता आहे.- सुरेश शेलकी,कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगावकांदा लागवडीसाठी सुमारे चारवेळा बियाणे टाकली. अवकाळी पावसाने लागवडकेलेला पोळ कांदा व दुसºयांदा टाकलेले कांदा रोप खराब झाले. तिसºयांदा टाकलेले उळे दाट धुके व दवामुळे खराब झाले. आतापुन्हा बियाणे टाकली असून, बदलत्या वातावरणामुळे त्याचीही शाश्वती राहिलेली नाही. बियाणांसाठी मोठा खर्च झाला आहे.- प्रभाकर बोरणारे,शेतकरी पाटोदा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा