शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांना रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST

गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : हवामान बदलामुळे उत्पादनात घट; बाजारभावाच्या चढ-उताराची धास्ती

गोरख घुसळे।पाटोदा : गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात होणारी घट व सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरीवर्गात धाकधूक वाढली आहे.चांगला दर हाती लागावा म्हणून शेतकरी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणत आहेत. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होत असून, औषधे फवारणीचा खर्च डोईजड होताना दिसत आहे. बाजारभावातील चढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी शेतात उपलब्ध असलेला कांदाविक्र ीवर भर दिला आहे.खरीप कांद्यापाठोपाठ रब्बी रांगडा कांदा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी टाकलेली रोपेही ढगाळ हवामान, धुके व दवामुळे खराब झाली आहेत. त्यांच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. रब्बीच्या गहू, हरभराप्रमाणेच कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पोळ कांदा शेतातच सडून गेल्याने कांदा दरात अचानक वाढ झाली. रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीसाठी आवश्यक कांदा रोपेही या पावसाने सडून गेल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येवला तालुक्यासह निफाड, चांदवड, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव या भागातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा रोपांना सोन्याचा भाव आला आहे. मिळेल त्या दराने शेतकºयांनी रोपे खरेदी केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उत्पादन अधिक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांदा पिवळा पडत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा निम्मे उत्पादनदेखील हाती लागले नाही.कांदा विक्रीवर शेतकºयांचा भरकांदा लागवड, मजुरी व कीटकनाशक फवारणीचा खर्च लाखात गेला आहे. आज मिळणारा बाजारभाव पाहता शेतकºयांना जास्तीचा दर मिळत आहे असे दिसत असले तरी ते खर्चाच्या हिशेबाने कमी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कांद्याच्या दरात चार हजारांनी घसरण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. बाजारभावातीलचढ-उतार रडवणार तर नाही ना, या भीतीपोटी शेतकºयांनी शेतात उपलब्ध असलेला कांदा विक्र ीवर भर दिला आहे.सुमारे साठ हजार रुपयांची कांदा रोपे विकत आणून एक एकर कांदा लागवड केली. मजुरी, लागवड खर्च, मशागत असा सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. त्यात बाजारभावात चढ-उतार सुरू असल्याने कांदा उत्पादनासाठी केलेला लाखाचा खर्च वसूल होईल का? याची चिंता आहे.- सुरेश शेलकी,कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगावकांदा लागवडीसाठी सुमारे चारवेळा बियाणे टाकली. अवकाळी पावसाने लागवडकेलेला पोळ कांदा व दुसºयांदा टाकलेले कांदा रोप खराब झाले. तिसºयांदा टाकलेले उळे दाट धुके व दवामुळे खराब झाले. आतापुन्हा बियाणे टाकली असून, बदलत्या वातावरणामुळे त्याचीही शाश्वती राहिलेली नाही. बियाणांसाठी मोठा खर्च झाला आहे.- प्रभाकर बोरणारे,शेतकरी पाटोदा

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा