शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
7
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
8
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
9
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
10
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
11
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
12
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
13
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
14
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
15
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
16
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
17
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
19
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

आरोप प्रत्यारोपाने नाशिक कोरोनामुक्त होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 3:22 PM

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या पद्धतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, ते येताना तर दिसत नाहीच, उलट परस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अशावेळी खरे तर पालक म्हणून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी कामकाज करण्याची गरज असताना दुसरीकडे कामापेक्षा सारेच आरोप-प्रत्यारोपात मश्गुल आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लोकप्रतिनिधींमार्फत सहकार्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र तसे होत नसेल आणि शहर कोरोनामुक्तकरण्यास त्यांची साथ मिळत नसेल तर शहरातील वातावरण बदलणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे काम कमी वादच जास्तराजकारण कधी टाळणार?

संजय पाठक, नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या पद्धतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, ते येताना तर दिसत नाहीच, उलट परस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अशावेळी खरे तर पालक म्हणून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी कामकाज करण्याची गरज असताना दुसरीकडे कामापेक्षा सारेच आरोप-प्रत्यारोपात मश्गुल आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लोकप्रतिनिधींमार्फत सहकार्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र तसे होत नसेल आणि शहर कोरोनामुक्तकरण्यास त्यांची साथ मिळत नसेल तर शहरातील वातावरण बदलणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक शहरातील स्थिती आता नियंत्रणाबाहेर चालली असून, दररोज सरासरी दीडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत. १ जून रोजी नाशिक शहरात अवघे २४० रुग्ण होते आणि दहा जणांंचा मृत्यू झाला होता. आज शहरात तब्बल पाच हजार रुग्ण असून, १९५ जणांचा मृत्यू झाला आहेत. नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑातून रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. महापालिकेने कोरोनामुक्तीसाठी किती चाचण्या वाढविल्या हा भाग वेगळा, परंतु रुग्णसंख्या वाढती आहे आणि नाशिक रेडझोनमध्ये आहे. मालेगावसारख्या शहरात कोरोना नियंत्रणात आली आज तेथे अवघे ६७ प्रतिबंधित क्षेत्रे असताना दुसरीकडे मात्र, नाशिक शहरात पावणेतीनशेहून अधिक प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या प्राण कंठाशी आल्यासारखी स्थिती आहे. आज नाशिककर घरातून बाहेर पडताना घाबरतात, घरात परत आल्यानंतर कुटुंबीय घाबरतात. रुग्णालातील स्थिती इतकी गंभीर आहे, की आता कोरोना काय परंतु कोणतेच आजार नको अशी मानसिकता झाली आहे.

शहरात अशी स्थिती असताना त्यासाठी प्रशासनानेच लढावे आणि लोकप्रतिनिधींनी काहीच सहभाग देऊ नये, अशी स्थिती नाही. काही प्रमाणात लोकप्रतिनिधी आपल्या स्तरावर काम करीत आहेत. महापौरांनी प्रशासनाच्या बैठकादेखील घेतल्या आहेत, अन्य पक्षांतील काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर कामे केली आहेत, त्याविषयी दुमत नाही. मात्र, ज्या कारणावरून सध्या वाद धुमसतो आहे, ते बघता एकत्रित प्रयत्न किंवा महापालिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न झालेले दिसत नाहीत. महापालिकेच्या महासभा आॅनलाइन झाल्याने थेट बैठका होत नाहीत. कोरोनाबाबत महापौरांनी महासभा नियोजित केली, परंतु राजीव गांधी भवनातच रुग्ण आढळल्याने ती रहित करावी लागली. अशा स्थितीत कुठे तरी एकत्रित प्रयत्न प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची गरज असताना दुसरीकडे मात्र तसे होण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने ही राजकीय संधी साधून शिवसेनेने टीका केली आणि त्याला मग भाजपने प्रत्युत्तर दिले. ते कमी म्हणून की काय परंतु मनसेच्या ‘राजगडा’ला अचानक जाग आली आणि त्यांनी या वादात उडी मारून महापौरांना ‘च्यवनप्राश’ दिले. महापौरांनी त्यावर मनसेलाच च्यवनप्राशची गरज असल्याचे सांगून टोला लगावला. वाद स्थानिक पातळीवर न राहता हा राज्यात शासन शिवसेनेचे असल्यानेच नाशिक महापालिकेत निधी दिला जात नाही इतपर्यंत आरोप झाले.

मुळात अशा वादात तथ्य नसते. एकमेकांवर पक्षीय अभिनिवेश बाळगणारे नंतर एकत्र येतात. महापालिकेत तर बऱ्याच पक्षविरहित कामकाज चालते. परंतु हे कामकाज आता कोरोनाच्या बाबतीत व्हायला हवे. प्रशासन काम करताना त्यात असलेल्या त्रुुटीदेखील दूर केल्या पाहिजे, परंतु प्रशासनातही काही संकट ही संधी साधून ज्या पद्धतीने काहीजण परिस्थितीचा लाभ उठवत आहेत, तेही थांबले पाहिजे परंतु त्यासाठी लोकप्रतिनिधींचे एकमत हवे. लोकप्रतिनिधींची दुही ही प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांत मोठी बाजू आहे, त्यामुळे आपसातील वादात अधिकाऱ्यांना चांगभल करण्याची संधी मिळता कामा नये हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याsatish kulkarniसतीश कुलकर्णीShiv Senaशिवसेना