शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

मनपा आयुक्तांच्या संकल्पाने गोदावरीचे भाग्य उजळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:17 IST

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.

ठळक मुद्देनदी संवर्धनावर भर सशोभिकरणासाठी प्रयत्न

संजय पाठक,

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.गोदावरी नदी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याच प्रश्न आहे, असे म्हंटले जाते. परंतु ते जर खरच वास्तव असते तर मुळातच शासकिय यंत्रणा आणि पर्यावरणवाद्यांना त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली नसती. हा संघर्ष सुरू असताना कैलास जाधव यांच्या सारखे गोदावरी नदीच्या संर्वधनाला  प्राधान्य देणारे आयुक्त लाभले ही अत्यंत सुखावह बाब असली तरी अडचणींचा डोंगर ते कितपत पार करतील या विषयी शंका आहे. नाशिक शहरातून जाणारे गोदावरी नदीचे पात्र मर्यादीत आहे परंतु हा विषय गोदावरी पुरता मर्यादीत राहत नाही कारण शहरातील वाघाडी आणि नासर्डी या लहान उपनद्या गोदावरीलाच मिळतात. त्यामुळे एकट्या गोदावरी नदीकडे लक्ष पुरवून उपयोगाचे नाही तर अन्य घटकांचा देखील विचार करावा लागणार आहे.गोदावरी नदीत उद्योग कारखान्यातून होणारे प्रदुषण हा एक भाग,नागरीकांकडून केली जाणारी अस्वच्छता आणि प्रदुषण हा दुसरा भाग तर महापालिकेच्या उणिवांमुळे निर्माण होणारे हा तिसरा भाग होय. यात औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण हा विषय ब-याच अंशी एमआयडीसीच्या अंतर्गत आहे. प्लेटींग सारख्या उद्योगांनी एकत्र येऊन सीईटीपी उभारण्याचा प्रयत्न केला अलिकडेच या उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या परंतु एमआयडीसीकडूनच अनुदान येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणांचा मुखभंग झाला. नागरीकांची उदासिनता हा तर खूप वेगळा विषय. गोदावरीला पवित्र म्हणायचे आणि याच गोदेत सर्व काही गोदार्पण म्हणून टाकून द्यायचे, वाहने- कपडे- जनावरे धुवायची आणि वरून गोदावरीला जीवनदायिनी म्हणायचे हा निव्वळ दुटप्पीपणा झाला. त्यामुळे हा विषय बाजुला ठेवला महापालिकेकडून होणारे प्रदुषण थांबले तरी खूप काही केल्या सारखे होईल.महपाालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून कमी कमी प्रदुषीत पाणी सोडणे बंधनकारक आहे. मात्र, ते काम गोदाप्रेमींच्या रेट्यामुळे किमान कागदोपत्री पुढे सरकत आहे. गंगापूर येथील एसटीपीचे काम झाले परंतु पिंपळगावचे काम झालेले नाही. ते पुर्ण होत असतानाच निरीच्या नव्या निकषानुसार प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी हा तीसवरून दहा असा करण्यात आला. त्यासाठी सर्व जून्या एसटीपींचे नुतनीकरण करायचे ठरलेतरी त्याला कोट्यवधी रूपये लागणार आहेत. त्यामुळे हे काम किती दिवसात होईल हे सांगतायेत नाही. अगदी तपोवन किंवा टाकळी एसटीपी परीसरात आयुक्तांनी सहज चक्कर मारली तरी अवस्था त्यांच्या लक्षात येईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे गोदावरी शुध्दीकरणासाठी महापालिकेची भूमिका अधिक महत्वाची असली तरी एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळापासून छावणी मंडळापर्यंत सा-यांशी संबंधीत हा विषय आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या यंत्रणेला चालना दिली तरी या अन्य शासकिय यंत्रणा अगदीच संथगतीने काम करीत असल्याचा अनुभव आहे. नदी शुध्दीकरण हा बहुधा त्यांच्या पटलावरील सर्वात शेवटचा विषय असावा, अशावेळी आयुक्त जाधव यांनी केलेल्या संकल्पाचे स्वागतच आहे परंतु त्यांना या यंत्रणांची साथ कितपत मिळते ते महत्वाचे आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी