शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मनपा आयुक्तांच्या संकल्पाने गोदावरीचे भाग्य उजळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:17 IST

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.

ठळक मुद्देनदी संवर्धनावर भर सशोभिकरणासाठी प्रयत्न

संजय पाठक,

नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला आहे. त्याचे स्वागत असले तरी नदीचे शुध्दीकरण हा अत्यंत गुंतागूंतीचा आणि दीर्घकालीन प्रयत्नांचा विषय आहे. आयुक्तांनी त्यांची नाशिकमधील संपुर्ण कारकिर्दीतील एकमेव अजेंडा म्हणून गोदावरीकडे बघितले तरी खरोखरीच हा प्रश्न कितपत सुटेल या विषयी शंका आहे.गोदावरी नदी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याच प्रश्न आहे, असे म्हंटले जाते. परंतु ते जर खरच वास्तव असते तर मुळातच शासकिय यंत्रणा आणि पर्यावरणवाद्यांना त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली नसती. हा संघर्ष सुरू असताना कैलास जाधव यांच्या सारखे गोदावरी नदीच्या संर्वधनाला  प्राधान्य देणारे आयुक्त लाभले ही अत्यंत सुखावह बाब असली तरी अडचणींचा डोंगर ते कितपत पार करतील या विषयी शंका आहे. नाशिक शहरातून जाणारे गोदावरी नदीचे पात्र मर्यादीत आहे परंतु हा विषय गोदावरी पुरता मर्यादीत राहत नाही कारण शहरातील वाघाडी आणि नासर्डी या लहान उपनद्या गोदावरीलाच मिळतात. त्यामुळे एकट्या गोदावरी नदीकडे लक्ष पुरवून उपयोगाचे नाही तर अन्य घटकांचा देखील विचार करावा लागणार आहे.गोदावरी नदीत उद्योग कारखान्यातून होणारे प्रदुषण हा एक भाग,नागरीकांकडून केली जाणारी अस्वच्छता आणि प्रदुषण हा दुसरा भाग तर महापालिकेच्या उणिवांमुळे निर्माण होणारे हा तिसरा भाग होय. यात औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण हा विषय ब-याच अंशी एमआयडीसीच्या अंतर्गत आहे. प्लेटींग सारख्या उद्योगांनी एकत्र येऊन सीईटीपी उभारण्याचा प्रयत्न केला अलिकडेच या उद्योगांना नोटिसा देण्यात आल्या परंतु एमआयडीसीकडूनच अनुदान येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणांचा मुखभंग झाला. नागरीकांची उदासिनता हा तर खूप वेगळा विषय. गोदावरीला पवित्र म्हणायचे आणि याच गोदेत सर्व काही गोदार्पण म्हणून टाकून द्यायचे, वाहने- कपडे- जनावरे धुवायची आणि वरून गोदावरीला जीवनदायिनी म्हणायचे हा निव्वळ दुटप्पीपणा झाला. त्यामुळे हा विषय बाजुला ठेवला महापालिकेकडून होणारे प्रदुषण थांबले तरी खूप काही केल्या सारखे होईल.महपाालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून कमी कमी प्रदुषीत पाणी सोडणे बंधनकारक आहे. मात्र, ते काम गोदाप्रेमींच्या रेट्यामुळे किमान कागदोपत्री पुढे सरकत आहे. गंगापूर येथील एसटीपीचे काम झाले परंतु पिंपळगावचे काम झालेले नाही. ते पुर्ण होत असतानाच निरीच्या नव्या निकषानुसार प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी हा तीसवरून दहा असा करण्यात आला. त्यासाठी सर्व जून्या एसटीपींचे नुतनीकरण करायचे ठरलेतरी त्याला कोट्यवधी रूपये लागणार आहेत. त्यामुळे हे काम किती दिवसात होईल हे सांगतायेत नाही. अगदी तपोवन किंवा टाकळी एसटीपी परीसरात आयुक्तांनी सहज चक्कर मारली तरी अवस्था त्यांच्या लक्षात येईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे गोदावरी शुध्दीकरणासाठी महापालिकेची भूमिका अधिक महत्वाची असली तरी एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळापासून छावणी मंडळापर्यंत सा-यांशी संबंधीत हा विषय आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या यंत्रणेला चालना दिली तरी या अन्य शासकिय यंत्रणा अगदीच संथगतीने काम करीत असल्याचा अनुभव आहे. नदी शुध्दीकरण हा बहुधा त्यांच्या पटलावरील सर्वात शेवटचा विषय असावा, अशावेळी आयुक्त जाधव यांनी केलेल्या संकल्पाचे स्वागतच आहे परंतु त्यांना या यंत्रणांची साथ कितपत मिळते ते महत्वाचे आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी