शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशाचा बार आपटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:08 IST

नाशिक : दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

ठळक मुद्देशिवसेनेत घुसमटसमर्थनाबरोबरच विरोधही मोठा

संजय पाठक, नाशिक: दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा बार कसा वाजणार? उडणार की आपटणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सानप यांना पक्षात घेण्याविषयी मतभेद असल्याने आजतरी त्यांना स्वगृही परतणे सोपे नाही.

सानप हे खरे तर मूळ काँग्रेस पक्षाचे ! पण भाजपात त्यांचे नशीब फळफळले आणि थेट महापौर झाले. त्यानंतर पक्षाला अधिक ‘अच्छे दिन’ आल्यानंतर थेट आमदार झाले. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम राहिले. अर्थातच, ते तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या शब्दाला इतके वजन वाढले की, संघटनात्मक शिस्तीमध्येदेखील संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तडजोडी करून त्यांना सोयीची वाटतील असे निर्णय घेतले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप पूर्णत: त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिकाच पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला आणि त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भाजप सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले. त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले आणि थेट शिवसेनेत ते दाखल झाले.

खरे तर सानप यांना उमेदवारी नाकारलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून शिवसेना खूप काही देईल. राज्यात भाजप सत्तेवर न आल्याने आता शिवसेना त्यांचा उपयोग नाशिकमध्ये भाजप डॅमेज करण्यासाठीच करेल त्यासाठी त्यांना जिल्हाप्रमुखपद किंवा विधान परिषदेवर संधी मिळेल अशा अटकळी होत्या. त्यातही सानप यांचा जीव आमदारकीत होता, असे सांगितले जाते. परंतु शिवसेनेने तसे काही केले नाही. भाजपा संस्कृतीशी नाळ जुळलेल्या सानप यांना येथे मात्र तसे काही न करता आल्याने त्यांची तेथेही घुसमट सुरू झाली, त्यातून आता स्वगृही परतण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ते फिल्डिंग लावत असले तरी या साऱ्या गाेष्टी सोप्या नाहीत. पक्षात असतानाही सानप यांना ज्या पद्धतीने कामकाज केले त्यातून दुखावलेले मूळ भाजप कार्यकर्ते आजही सानप यांना अनुकूल नाही. शहरातील तीन आमदारांपैकी अपवादानेच कोणी सानप यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यासाठी अनुकूल असेल अशी स्थिती आहे.

सानप यांचे संघ परिवाराशी चांगले संबंध असले तरी तरी नेमके ते कितपत तारतील याविषयी शंका आहे. मुळात सानप यांच्या पक्षप्रवेशाला प्रमुख अनुकूलता हवी ती गिरीश महाजन यांची ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मंत्री असलेले म्हणून महाजन यांचे नाव होते आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जेव्हा सानप यांना डावलून ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी फडणवीस यांनी थेट सानप यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे आता सानप दीड दोन वर्षांत कसे पावन झाले? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते आता काय निर्णय ‌घेतात हेदेखील महत्त्वाचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाPoliticsराजकारणGirish Mahajanगिरीश महाजनBalasaheb Sanapबाळासाहेब सानप