शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

तस्कर रडारवर : नाशिकवर 'वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो'चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:09 IST

वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे.

ठळक मुद्दे 'वाईल्डलाइफ क्राईम सेल'कडून संभाषणाची चाचपणीअजामीनपात्र गुन्हा; गंभीर शिक्षेची तरतूद

नाशिक : नैसर्गिक जैवविविधतेने समृध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वन्यजीव तस्करींचे प्रमाण वाढल्याचे विविध घटनांवरून समोर येत आहे. पुर्व वनविभागाने नुकत्याच एका कारवाईत दोन पोलिसांसह जिल्ह्यातून तब्बल २० संशयित तस्करांची टोळी फोडण्यास यश मिळविले आहे; मात्र आता नाशिक जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या तस्करीबाबत चालणाऱ्या हालचालींकडे 'वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो' वॉच ठेवून आहे.आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातसुध्दा शहरी भागातील धनाड्य लोक हव्यासापोटी अथवा आपल्या कौटुंबिक नैसर्गिक समस्यांवर उपाय म्हणून अंधश्रध्देला बळी पडताना दिसत आहे. भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसुची-१मध्ये संरक्षित असलेल्या काही ठराविक वन्यजीवांची तस्करी या अंधश्रध्देच्या बाजारात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा मित्र संबोधला जाणारा मांडूळ जातीचा सर्प, निशाचर घुबड पक्षी, गोड्या पाण्यातील मऊ पाठीचे कासव यासारख्या मुक्या वन्यप्राण्याचा जीव संकटात सापडत आहे.राज्य सरकारच्या वन-वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित कार्यान्वित असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रक ल्पाचे वाईल्डलाइफ क्राईम सेल व मुंबईस्थित वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरोद्वारे आता नाशिककडे खास नजर ठेवली जात आहे. अंधश्रध्देपोटी वन्यजीवांची तस्करी स्थानिक पातळीवर आणि आंतरराष्टÑीय बाजारात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे वन्यजीवांच्या बाबतीत होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या दोन्ही अस्थापनाच्या रडारवर नाशिकमधील अजुन काही संशयित आहेत.वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या मोबाईलची छाननी सुरू करण्यात आली आहे. याद्वारे अजून काही 'मासे' पुर्व वनविभागाच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.अजामीनपात्र गुन्हा; गंभीर शिक्षेची तरतूदअनुसुची-१मधील संरक्षित असलेल्या वन्यजीवांची शिकार किंवा तस्करी करणे हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा अजामीनपात्र स्वरूपाचा असून यामध्ये तुरूंगवासासह आर्थिक शिक्षेचीसुध्दा तरतूद असल्याचे उपवनसंंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवCrime Newsगुन्हेगारीenvironmentपर्यावरण