शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:27 IST

येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 

ठळक मुद्देसीआरपीएफचे जवान दिगंबर शेळके याचा मृत्यू संशयास्पद मृत्युच्या कारणांची चौकशी व्हावी, शेळके कटुंबियांची मागणी

नाशिक : येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. येवला तालुक्यातील सीआरपीएफचे दिवंगत जवान दिगंबर शेळके यांचा आसाममध्ये मृत्यू झाल्यानंतर सीआरपीएफकडून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शेळके यांच्या मृत्यूविषयी कोणतीही सविस्तर माहिती अथवा त्यांच्या सेवेपासून मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा शेळके कुटुंबीयांना मिळाल्या नाही. त्यामुळे शेळके कुटुंबीयांनी दिगंबर शेळके यांच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करीत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, शेळके कुटुंबीयांसमवेत. निर्मला पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा महाजन, लक्ष्मिकांत पारनेरकर, आशा निकम, अर्चना श्रीवास्तव, सविता पवार, सचिन खटकाळे, रामदास खटकाळे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.  दरम्यान, दिगंबर शेळके यांच्या निधनानंतर सीआरपीएफने केवळ त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे कोणतेही साहित्य कुटुंबीयांना पोहोचविण्यात आलेले नाही. तसेच कु टुंबीयांची साधी चौकशीही झाली नसून जवानाच्या मृत्यूनंतर मिळणारे सानुग्रह अनुदान आणि अन्य सुविधांपासूनही शेळके कुटुंबीय वंचित आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीSoldierसैनिकPoliceपोलिस