शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
4
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
5
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
6
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
7
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
8
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
9
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
10
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
11
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
12
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
14
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
15
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
16
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
17
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
18
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
19
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
20
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद मृत्यू झालेल्या जवानाच्या पत्नीचे नाशिकमध्ये उपोषण ; शेळके कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:27 IST

येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 

ठळक मुद्देसीआरपीएफचे जवान दिगंबर शेळके याचा मृत्यू संशयास्पद मृत्युच्या कारणांची चौकशी व्हावी, शेळके कटुंबियांची मागणी

नाशिक : येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करीत शेळके कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेळके यांच्या पत्नी अनिता दिगंबर शेळके यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. येवला तालुक्यातील सीआरपीएफचे दिवंगत जवान दिगंबर शेळके यांचा आसाममध्ये मृत्यू झाल्यानंतर सीआरपीएफकडून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला. परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शेळके यांच्या मृत्यूविषयी कोणतीही सविस्तर माहिती अथवा त्यांच्या सेवेपासून मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या सुविधा शेळके कुटुंबीयांना मिळाल्या नाही. त्यामुळे शेळके कुटुंबीयांनी दिगंबर शेळके यांच्या मृत्यूविषयी साशंकता व्यक्त करीत त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दिगंबर शेळके यांना शहीद घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, शेळके कुटुंबीयांसमवेत. निर्मला पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा महाजन, लक्ष्मिकांत पारनेरकर, आशा निकम, अर्चना श्रीवास्तव, सविता पवार, सचिन खटकाळे, रामदास खटकाळे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.  दरम्यान, दिगंबर शेळके यांच्या निधनानंतर सीआरपीएफने केवळ त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे कोणतेही साहित्य कुटुंबीयांना पोहोचविण्यात आलेले नाही. तसेच कु टुंबीयांची साधी चौकशीही झाली नसून जवानाच्या मृत्यूनंतर मिळणारे सानुग्रह अनुदान आणि अन्य सुविधांपासूनही शेळके कुटुंबीय वंचित आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीSoldierसैनिकPoliceपोलिस