शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

...अन् तो एकटाच निघाला तिच्यासोबत अखेरच्या यात्रेला; नाशकात पत्नीचा अपघाती मृत्यू, तरुण सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:10 IST

परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला अन् तो भांबावून गेला.

अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक |

मोठ्या आनंदात एकमेकांचा हात धरून देवदर्शनाला निघालेले जन्माचे सोबती. आंध्र प्रदेशातले घर सोडून एकमेकांच्या साथीने हे दोघे नाशिकला पोहोचले, पण काळाने घात केला.. ती त्याला नाशकात सोडून कायमची निघून गेली.. आणि तो स्वतःशी विचारतो की, तिचे मृत शरीर सोबत घेऊन एकटाच घरी कसा जाऊ..?

शिर्डीतून सायंकाळी निघालेले ते दोघे शहरातील महामार्ग बसस्थानकावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बसमधून उतरले. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसची चौकशीकरिता हे दोघेही त्या बसच्या समोरून ओट्यावरून जात होते. याचवेळी अचानकपणे फलाटावरून बस वेगाने स्थानकात शिरली अन् अंजली या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली. या दुर्घटनेमुळे ती क्षणात वेगळ्या प्रवासाला निघून गेली, एकटीच ! त्यांचा जीवन'प्रवास' अर्ध्यावरच एका अपघाताने थांबवला. या हृदयद्रावक दुर्घटनेने सारेच हळहळले. 

परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला अन् तो भांबावून गेला. भिरभिरत्या नजरेने तो जिल्हा रुग्णालयातील माणसे न्याहाळू लागला. मातृभाषेचा अपवाद वगळता केवळ इंग्रजी येत असल्याने संवाद साधण्याची अडचण झाली. पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून जिल्हा रुग्णालयात त्याने रात्र काढली. पोलिसांनी मरणोत्तर पंचनाम्याची प्रक्रिया आटोपली. सकाळी महामंडळाचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. शवविच्छेदनासह सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यास मुपल्ला यास कर्मचारी- अधिकारी यांनी मदतीचा हात दिला. रुग्णवाहिकेतून (एम.एच१५ एचएच ४४१२) दुपारी दोन वाजता सायरनच्या आवाजात त्यांचा आंध्र प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

...जणू आसवे कोरडी पडली 

बस दुर्घटनेत पत्नीची साथ कायमची गमावलेल्या मुपल्ला नागार्जुन या युवकाने परतीचा प्रवास तिचा मृतदेह सोबत घेत घराकडे एकट्याने करायचे ठरविले. सुमारे १२०० कि.मी.चा परतीचा प्रवास रविवारी जिल्हा रुग्णालयामधून पत्नीच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेने सुरू झाला. यावेळी तिशीतल्या युवकाचा कंठ भरून येत होता; मात्र डोळ्यांतील आसवेही जणू कोरडी पडली होती. त्याचे कोणत्या भाषेत कोण, कसे सांत्वन करणार होते. 

लग्नाला अवघे अडीच वर्षे...! 

लग्नाला जेमतेम अडीच वर्षे झालेल्या अंजली व मुपल्ला यांनी एकमेकांच्या साथीने यापूर्वीही विविध शहरांत पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. आंध्र ते नाशिकपर्यंतचा या जोडप्याचा प्रवासही अत्यंत आनंदाचा होता. मात्र, नाशिकच्या बसस्थानकावर झालेल्या दुर्घटनेने या जोडप्याला मात्र एकमेकांपासून कायमचे वेगळे केले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस